इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरात एकीकडे गोदावरीला पूर असतांना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे गेले दोन दिवस नागरिकांना पाणीपुरठा होऊ शकला नाही. त्यामागे नेमकं काय घडलं हे सुध्दा स्मार्ट नाशिकच्या अधिका-यांनी कळवले नाही. त्यामुळे सर्वत्र गोंधळ होता. आता मनापाने एक निवेदन देऊन त्यामागील कारणे सांगितली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाणी पुरवठा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी सांगितले की, मनपाचे विविध जलशुध्दीकरण केंद्र व बुस्टर पंपींग स्टेशन येथे नाशिक स्मार्ट सिटी कंपनी येथे विविध विकास कामे करणे चालू आहे. त्यानुसार नाशिक स्मार्ट सिटी कंपनी यांनी मनपाची विविध जलशुध्दीकरण केंद्रे येथे नवीन व्हॉल्व्स व फ्लो मीटर्स बसविणेचे कामाकरीता शटडाऊनची मागणी केली. सदर कामे करणेकरीता शनिवार २१ जून रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपावेतो शटडाऊन घेणेत आले होते. त्यामुळे मनपामार्फत काही देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली होती. जुना गंगापुर रोड येथे पंपीग स्टेशनचे काम हाती घेतले असतांना रविवारी सकाळी ५.३० वाजेपर्यत सदर काम पुर्ण करण्यात आले. परंतु रविवारी सकाळी ९ वाजता सदर ठिकाणी पाईपलाईनला गळती सुरु असल्याचे निदर्शनास आले. पाईपलाईन मधील हवेमुळे Air Valve बंद होऊन पाईपलाईनमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन पाईपलाईनला मोठयाप्रमाणात गळती सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले.
परंतु सदर काम मोठया स्वरुपाचे असल्याने रविवारी करण्यात आलेले प्रयत्न् अयशस्वी झाले होते. सोमवारी पुनश्च गंगापुर धरणाचे पंपींग पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व सायंकाळी ४ वाजता सदर पाईपलाईन मधील पाण्याचा प्रवाह नियंत्रणात आणुन काम सुरु केले असता रात्री ११ वाजेपर्यंत काम पुर्ण करण्यात आले. सर्व जलशुध्दीकरण केंद्राचा आढावा घेतला व गंगापुर येथील पंपीग बंद करण्यात असता निलगीरी बाग जलशुध्दीकरण केंद्र येथील पाईपाईललाईनचा फ्लो १३०० m/hr कमी होऊन सकाळी ९ वाजेपर्यंत ९०० m/hr झाल्याने सर्व अभियंता यांना पंचवटी / नाशिक पश्चिम Air Valve तपासणी करणेबाबत सुचना दिल्या.
४ वाजता पुन:श्च Air Valve तपासणीच्या सुचना देण्यात आलेल्या असून गोदावरी नदीवरील पुलावर नव्याने Air Valve टाकण्याचे कार्यवाही युध्द पातळीवर सुरु आहे. सद्य: स्थितीत सर्व जलशुध्दीकरण केंद्रावरुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलेला असून निलगीरी बाग जलशुध्दीकरण केंद्रावरील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. लवकरात लवकर सदर काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. सदर बाबतीत दोन तीन दिवसात नागरीकांना पाणी पुरवठयाबाबत जो त्रास झाला त्याबददल् दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करणेत येईल. तरी शहरातील सर्व नागरीकांनी व लोकप्रतीनीधींनी सहकार्य करावे असे आवाहनही केले.