नाशिक – गोदावरी नदीला आलेला पूर सध्या ओसरला आहे, काल दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले होते. मात्र, पावसाने उघडीप घेतल्याने धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. परिणामी आता गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. सद्यस्थितीत दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंतच पाणी आहे. त्यामुळेच रामकुंड आणि गोदाकाठी पुन्हा व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.
आताची सद्यस्थिती दर्शविणारा हा व्हिडिओ