नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथील सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नाशिकमधील अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांत जास्त वर्दळ असणारा चौक असल्याने येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाशिककरांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
तसेच येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्यात यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर वाहतूक पोलिस व राष्ट्रीय महामार्ग विभागाला केलेल्या होत्या व यासाठी बैठक घेतलेली होती तसेच पत्रव्यवहारही केलेला होता.
त्यांच्या या पाठपुराव्यातून अखेर हे काम सुरू झाले असून लवकरच या ठिकाणी एक सुनियोजित वाहतूक व्यवस्था उभारण्यात येऊन वाहतूक कोंडी मधून नाशिककरांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.