नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ४ जूलै पर्यंत २६ टक्के साठा आहे. ३० जून पर्यंत हा साठा २१ होता त्यात आता ५ टक्के वाढ झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ३१ टक्के तर समुहात २२ टक्के साठा आहे. गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. आता पावसाला सुरुवात झाली असली तरी हा साठा ५ टक्के वाढला आहे. अजूनही दमदार पाऊस नाही. त्यामुळे जोपर्यंत जोरदार पाऊस होत नाही. तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
