नाशिक – गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एकूण साठा ९३ टक्क्यांवर गेला असून तब्बल १५ धरणांमधून विसर्ग सध्या सुरू आहे. तर, जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले गिरणा हे ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे यंदाच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.