नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २० जून अखेर ३५.६८ टक्के साठा आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व धरण भरले होते. त्यानंतर त्याच्यात घट झाली. आता जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर धरण पुन्हा भरु लागले आह. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के तर समुहात ४८.८० टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, नांदूरममध्यमेश्वर, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज यासह बहुतांश धरण पावसाळयात ओव्हरप्लो झाली होती. त्यानंतर इतर धरणातही आता ९९ टक्केच्या आसपास पाणीसाठा होता. आता २० जूनपर्यंत धरणाचा साठा ३५.६८ टक्के झाला आहे.
दोन महिन्यापूर्वी २८ एप्रिल अखेर ३३.६२ टक्के साठा होता. त्यात फक्त २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थात या दोन महिन्यात धरणात अवकाळी पाऊसाचे पाणी येत असले तरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापरही झाला.
