नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ७ फेब्रुवारी अखेर ७७.०२ टक्के साठा आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील धरण भरले होते. आता उन्हाळा सुरु झाला असून चार महिने हे पाणी पुरवावे लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ८२.२७ टक्के तर समुहात ७४.८८ टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, नांदूरममध्यमेश्वर, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज यासह बहुतांश धरण पावसाळयात ओव्हरप्लो झाली होती. त्यानंतर इतर धरणातही आता ९९ टक्केच्या आसपास पाणीसाठा होता. आता फेब्रुवारीपर्यंत धरणाचा साठा २३ टक्केच्या आसपास कमी झाला आहे. मे ते जून पर्यंत उन्हाळा आहे. त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा या धरणाचा साठा वाढणार आहे.