नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २८ ऑगस्ट अखेर ९१.८९ टक्के साठा आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ९१.३० टक्के तर समुहात ९१.९२ टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे धरण ओव्हरप्लो झाले. तर इतर धरणे जवळपास ८० ते ९० टक्केच्या पुढे आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता बहुतांश धरणात पाणीसाठा वाढला आहे. पण, नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणात आजही ० टक्के साठा आहे.
