नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना भारतनगर भागात घडली असून या घटनेत डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदू खंडू वाघमारे (५० रा. म्हाडा बिल्डींग,भारतनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पावसामुळे गच्चीत साचलेल्या पाण्याच्या वादातून शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी वाघमारे व त्यांच्या इमारतीतील नागरीकांमध्ये वाद झाला होता. हा वाद हातापायीवर गेला असता रवी नामक शेजाºयाने त्यांना लोटून गेले.
या घटनेत वाघमारे डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले होते. मुलगा दिपक वाघमारे यांनी त्यांना बेशुध्द अवस्थेत तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.