नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुगल मॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील पुरातन मंदिरे फोडणारी टोळी ग्रामिण पोलीसांनी हुडकून काढली आहे. या टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यात मॅकेनिक इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या म्होरक्याचा समावेश आहे. या म्होरक्याने मौजमजेसह शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी कारागृहात टोळीची सांगड घालत इप्सित साध्य केले आहे. युट्यूबच्या माध्यमातून हायड्रोलीक कटरचे प्रशिक्षण घेत या टोळीने अनेक मंदिरे फोडल्याची पोलीस तपासात समोर आले आहे. संशयितानी सात गुह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून तांबे पितळासह चांदीच्या वस्तू असा सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल हसत्गत करण्यात आला आहे. या टोळीतील दोन जण अद्याप फरार असून ते हाती लागताच अजून काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी वर्तविली आहे.
सुयोग अ्शोक दवंगे (२१ रा.हिरवगाव पावसा ता.संगमनेर अहिल्यानगर), संदिप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे (२३ रा.ओमकार सोसा.चाळ सावरकरनगर टिटवाळा,कल्याण) व अनिकेत अनिल कदम (२१ रा.स्टार बिल्डर चाळ आरकेनगर,कल्याण जि.ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून संदिप किसन साबळे (रा. पाचपट्टा अकोल जि.अहिल्यानगर) व दिपक विलास पाटेकर (रा.माऊलीकृपा चाळ टिटवाळा कल्याण ) हे दोघे संशयित फरार आहेत. अधिक्षक पाटील यांनी पदभार स्विकारताचा पेंडीग गुह्याचा निपटारा लावण्याचा धडाका लावला आहे. चो-या घरफोड्यांवर लक्ष केंद्रीत करीत त्यांनी गेल्या वर्षी व यंदा सिन्नर, लासलगाव, निफाड,वाडिव-हे आदी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या मंदिरामधील चोरी बाबत माहिती घेतली असता, चोरटे पोलीसांच्या हाती लागत नसल्याचे वास्तव समोर आले. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये आढळूनही चोरटे हाती लागत नसल्याने त्यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावली.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रविंद्र मगर यांनी घटनास्थळांवर मिळून आलेल्या तात्रींक बाबीची पडताळणी हाती घेत खबरे सतर्क केले असता सदरचे गुन्हे संगमनेर तालूक्यातील सराईताने केल्याचे पुढे आले. पथकाने चाकण एमआयडीसी व टिटवाळी जि. कल्याण येथे तळ ठोकत तीघांना हुडकून काढले असून त्यांनी पसार असलेल्या दोन साथीदारांच्या मदतीने मौजमजेसाठी व शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी जिल्हयातील सात मंदिरे फोडल्याची कबुली दिली आहे. या टोळीने नांदूर शिंगोटे येथील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला तांबे पितळ आणि चांदीच्या धातूच्या सुमारे दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात चांदीचा मुकूट,चांदीच्या दोन प्लेटा,२० किलो वजनाचा पितळी कळस,तीन मोठ्या समई, पितळी घोडा,सहा पितळी घंटा तसेच मंदिरामधील पितळ व तांब्याच्या छोट्या वस्तू आदींचा समावेश आहे. संशयित सुयोग दवंगे हा या टोळीचा म्होरक्या असून तो मॅकेनिक इंजिनिअरच्या दुस-या वर्गात शिक्षण घेत आहे. चोरीच्या गुन्हयात कारागृहात असतांना त्याने या टोळीची सांगड घालत या घरफोड्या केल्या आहेत.
या टोळीने अहिल्यानगरसह नाशिक जिल्हयात मालाविरूध्द गुन्हे केले असून त्यांचे साथीदार हाती लागताच अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबधीतांना वाडिव-हे पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या गुन्हयात अटक करण्यात आली असून तांबे पिकळाच्या वस्तू खरेदी विक्री करणाºयांचाही शोध घेतला जाणारा असल्याची माहिती अधिक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कामगिरी एलसीबीचे निरीक्षक रविंद्र मगर,जमादार नवनाथ सानप,अंमलदार विनोद टिळे,नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,संदिप नागपुरे आदींच्या पथकाने केली.