नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विहीरीत तोल जावून पडल्याने ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. उन्हाळयामुळे विहीरीनी तळ गाठल्याने पाण्याची पातळी बघत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुभाष वाघूजी साळवे (रा.तुळजा भवानी मंदिराजवळ,बाबळेश्वर पळसे ता.जि.नाशिक) असे मृत वृध्दाचे नाव आहे. साळवे कुटुंबिय आपल्या शेतात वास्तव्यास असून रविवारी (दि.३०) ते विहारीत पाण्याची पातळी बघण्यासाठी गेले असता ही घटना घडली. विहीराच्या काठावर बसून तळाला गेलेले पाणी पातळी बघत असतांना अचानक तोल गेल्याने ते विहीरीत पडले होते.
कुटुंबियासह शेजारी शेतक-यांनी धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढून जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.