नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात वडाळागावातील सल्ली पॉईट भागात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात टॅकर चालकाविरोधात अपघाताचा गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय गणपत तिडके (३६ रा.विष्णूविहार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टँकर चालकाचे नाव आहे. याबाबत पमा तानाजी गायकवाड (रा.पिंगुळबाग झोपडपट्टी वडाळागाव) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात बकुबाई तानाजी गायकवाड (६२ रा.पिंगुळबाग झोपडपट्टी वडाळागाव) या ठार झाल्या. गायकवाड सोमवारी (दि.२४) सल्ली पॉईंट येथील जाकिर कोकणी यांच्या तबेल्याजवळून पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ४६ एफ ४१४७ या पाण्याच्या टॅकरने त्यांना जोरदार धडक दिली होती.
या घटनेत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.