नाशिक – उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर परिसरात रस्त्याखाली दबलेल्या चेंबरच्या दुरूस्तीचे काम आज गुरूवारी, २७ मे रोजी सुरू झाले आहे. यामुळे शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश आले आहे.
नाशिकच्या उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, कालिकानगर, जगतापनगर येथे काही भागात नुकतेच डांबरीकरण झाले. त्यानंतर आणि पूर्वीही पावसाळी आणि भुयारी गटारींचे चेंबर रस्त्याखाली दबले होते. ते दुरूस्त करावे, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, दै. ‘सामना’चे पत्रकार बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चारुशिलाताई गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी केली होती. त्यानंतर गुरूवारी, २० मे रोजी महापालिका अधिकाऱ्यांनी दबलेल्या चेंबरची संयुक्त पाहणी केली. आठ दिवसांनंतर आज गुरूवारी, २७ मे रोजी चेंबर दुरुस्तीच्या कामाला तिडके नगरच्या अनमोल व्हॅलीमागील मधुरा पार्क येथून सुरुवात झाली. याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशिलाताई गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, श्रीकांत नाईक, दिगंबर खरे, संदीप महाजन आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.