भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी नाशिक-भुसावळ पॅसेंजर पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे खान्देशातील जळगाव, भुसावळ, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर यांना जोडणाऱ्या या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक-भुसावळ पॅसेंजर कोरोना काळात बंद झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. मात्र आता महिनाभरात ही पॅसेंजर सुरू होणार असल्याची सर्व प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे
नाशिक-भुसावळ ही आता पॅसेंजर न राहता एक्सप्रेस झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एक्सप्रेसचे भाडे द्यावे लागणार आहे. येत्या १६ सप्टेंबर पासून ही रेल्वे सुरू होत आहे. देवळाली-भुसावळ ही आता एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या गाडीला ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबा असून एक्सप्रेसचा दर्जा असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास महागणार आहे.
येत्या 16 सप्टेंबर पासून भुसावळून देवळालीकडे तर सप्टेंबर 17 सप्टेंबर पासून देवळालीहून भुसावळकडे ही एक्सप्रेस धावणार आहे. या गाडीला 12 डबे असून दहा डबे प्रवासी तर दोन डबे मालवाहतुकीसाठी असणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाडी (क्रमांक 11114 )भुसावळ देवळाली एक्सप्रेस भुसावळ स्थानकातून सायंकाळी 5:30 वाजता सुटून जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, पानेवाडी, मनमाड, लासलगाव, निफाड, कसबे सुकेने, खेरवाडी, नाशिकरोड आणि देवळालीला पोहोचणार आहे.
रात्री पावणे अकराच्या सुमारास ही एक्सप्रेस देवळाली स्टेशनवर पोहोचेल. त्यानंतर देवळाली स्थानकातून सुटणारी गाडी (क्रमांक 11113) ही सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटेल. त्यानंतर ती दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भुसावळला पोहोचेल. कोरोना काळात बंद असलेली भुसावळ देवळाली पॅसेंजर अखेर सुरु होणार असून या मार्गावर धावणार आहे. मात्र या पॅसेंजरचे एक्सप्रेसमध्ये रूपांतर झाल्याने प्रवास भाडे वाढणार आहे. जवळपास तिप्पट भाडे प्रवाशांना द्यावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागणार आहे.
Nashik Bhusawal Passenger Train Will Start Soon
Railway Connectivity