इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन आज विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले त्यात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उझबेगी परकिय आक्रमक बाबर याचा वशंज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छ. श्री सभांजी महाराज नगर या शहरात आहे. वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छ. श्री सभांजीनगर येथे पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली.
याच औरंग्याने शिख गुरु तगेबहादूर यांची हत्या केली. शिख गुरु गोविदंसिहं यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून यांना भितींत जिवंतपणी चिणून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती श्री सभांजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयकर यातनामय हत्या याने केली. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिराचे यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले. त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदुच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचुन हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्याप्रमाणावर धर्मांतरण केले.
अशा क्रूरकर्मा व आतातायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पुर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनांचे प्रतीक आहे. ही कबर पुर्णपणे नष्ट करावी. परकियांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. ती न काढळ्यास झाल्यास पुर्व सुचित करुन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजा बरोबर छ. श्री संभाजी महाराज नगराकडे कारसेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर उध्वस्त करतील.
विश्व हिंदू परिषद, नाशिक शहर जिल्हा मंत्री योगेश बहाळकर व बजरंग दल नाशिक शहर जिल्हा संयोजक श्रीकांत क्षत्रिय यांनी हे निवेदन दिले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री अनिल चांदवडकर, नाशिक जिल्हा मंत्री योगेश बहाळकर, सह मंत्री अमृत सदावर्ते, पंकजराज अटल,सागर वाघ,विशाल शर्मा, कृष्णा साखला, गौरव गवळी, सौरभ पाटील, केदार जोशी, मोहित चौधरी,सचिन ढोले, प्रशांत लोणारी, ऋषिकेश काळे, सुमित पाटोळे, सौरभ पाटील, नयन घरटे, मोहन चौधरी हे उपस्थितीत होते.