इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला असून ते एकाच कुटुंबातील असून बहिण-भाऊ आहेत. हे सर्व चार बंगला अंधेरीतील रहिवासी आहेत. मृतात दत्ता आंब्रे, नित्यानंद सावंत, विद्या सावंत, मीना सावंत यांचा समावेश आहेत. गुरू पौर्णिमेनिमित्त हे सर्व जण रामदास बाबांच्या मठात दर्शनासाठी गेले होते. परतताना वाटेत हा भीषण अपघात घडला.
गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील हे चौघे जण ठार झाले. गुरुपौर्णिमेनिमित्त रामदास बाबा यांच्या मठातून दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
या कारचा अपघातात घडल्यानंतर घटना स्थळी घोटी पोलिस, महामार्ग पोलिस, टोल नाक्याची टीम दाखल झाली. मृतांना कारचे पत्रे कापुन काढण्यात आले आहे.