नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने एका अनोळखी पादचाºयास चिरडले. हा अपघात महामार्गावरील बालभारती समोर उड्डानपुलावर झाला. सदर इसमाच्या तोंडावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याने त्याचा चेंदामेंदा झाला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. उड्डाणपूलावरून मुंबईनाक्याच्या दिशेने पायी जाणाºया अज्ञात इसमास पाठीमागून भरधाव येणाºया अवजड वाहनाने धडक दिली. या अपघातात रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्याने सदर इसमाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमादार हारूण शेख यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बागुल करीत आहेत.