मंगळवार, सप्टेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पीक विम्याच्या रकमेसाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल

by Gautam Sancheti
ऑगस्ट 16, 2021 | 3:36 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210816 WA0216

नांदगाव – नांदगाव विधानसभा मतदार संघाचे सत्तारुढ शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी शेतकऱ्यांना पिक विमा परतावा मिळालेला नसल्यामुळे थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या दाव्याच्या सुनावणीस विमा कंपनी गैरहजर राहिली. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीस गैर हजर राहिल्यास शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला जाईल असे निर्देश दिले आहे. पिका विमा बद्दल राज्यभर आक्रोश असतांना पहिल्यांदा सत्तारुढ पक्षाच्या आमदाराने दंड थोपटत थेट न्यायालयाकडे दाद मागितल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट जनहित याचिका दाखल करणारे आमदार सुहास कांदे हे देशातील पहिले लोकप्रतिनिधी आहे. आपल्याच मतदार संघातील प्रश्नांना जनहित याचिकेच्या पातळीवर नेतांना त्यांनी जवळपास ७१ हजार शेतकऱ्यांकडून भरभक्कम पुरावे संग्रहित करुन ते दाखल केले. त्यामुळे त्यांच्या या धाडसाचे राजकीय वर्तुळात कौतुकही होत आहे.

या याचिका बद्दल आ. कांदे यांनी नांदगाव येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नैसर्गिक संकटामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरु केली. सदर योजना केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व पिक विमा कंपनी असे तिचे मिळून राबवत असतात. त्या योजनेप्रमाणे २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. २०२०-२१ मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना देखील विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही. त्याबाबत केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व पिक विमा कंपनी यांचेशी वारंवार पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला. परंतु भारती अॅक्सा जनरल इंश्युरन्स कंपनीने त्याकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विमा परतावा दिलेला नाही. नांदगांव मधून ३०५८५ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून त्याचा हफ्ता एकुण १९८६४७८५ इतका भरला आहे. त्यापैकी २३४६६ शेतकरी आणि नांदगाव मतदार संघात समाविष्ट असलेले मालेगाव तालुक्यातील गावांमधील जवळपास २५ हजार शेतकऱ्यांना पिक विमा परतावा मिळालेला नाही. शेतकरी त्यांच्या हक्काचा पिक विमा परतावा मिळण्यापासून दीड ते दोन वर्षांपासून वंचित असल्यामुळे पिक विमा परतावा मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (नं. ५६ / २०२१) दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेवून या याचिकेवर दि. १२/०८/२०२१ रोजी प्रथम सुनावणी झाली. या प्रथम सुनावणीच्या वेळी पिकविमा कंपनी गैरहजर होती. पण, पुढील सुनावणीस पीकविमा कंपनी गैरहजर राहिल्यास विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकविमा परतावा द्यावा असा आदेश देण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने निर्देशित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेल्वेत बंपर भरती : परीक्षा न घेता थेट मुलाखती; संधी सोडू नका

Next Post

असा आहे नाशिक जिल्हयातील धरणाचा पाणीसाठा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

असा आहे नाशिक जिल्हयातील धरणाचा पाणीसाठा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011