शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नांदगावमध्ये कांदे – भुजबळ गटात राडा…सुहास कांदे यांची समीर भुजबळांना जीवे मारण्याची दिली धमकी

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2024 | 1:03 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20241120 130007 Collage Maker GridArt

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. या राड्यात सुहास कांदे यांनी थेट समीर भुजबळांना मारुन टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नांदगाव मतदार संघात मोठी खळबळ निर्माण झाली. सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळ यांनी अडवल्यानंतर हे दोन्ही उमेदवार आमनेसामने आले. यानंतर हा राडा झाला. पोलिसांनी दोन्ही गटाला समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

नांदगाव मतदारसंघातील परिस्थिती नियंत्रणात…जिल्हा निवडणूक अधिकारी
नांदगाव मतदारसंघात आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये मतदारांची ओळख पटविणाऱ्यावरुन वाद निर्माण झाला होता. तेथे पोलिस पथक वेळीच दाखल झाले असून लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

नांदगाव मतदारसंघात एका उमेदवाराने मतदारांच्या ओळखीवरून संशय व्यक्त केला होता. त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. तथापि, पोलिस, निवडणूक निरीक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच लोकप्रतिनिधीत्व कायद्यासह आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या ओळखीबाबत उमेदवारांना संशय असेल, तर मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून मतदारांची ओळख पटवितात. ते खात्री करूनच मतदारांना मतदानाची परवानगी देतात, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या…वसईच्या घटनेवर विनोद तावडे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Next Post

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झाले इतके मतदान…बघा १५ मतदार संघाची स्वतंत्र टक्केवारी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20241120 WA0135

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झाले इतके मतदान…बघा १५ मतदार संघाची स्वतंत्र टक्केवारी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011