न्यूयॉर्क – म्यानमार मधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याटे दिसून येत आहे. म्यानमारमधील लष्कराने नागरिकांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आता अमानुषपणाचा कळस गाठला आहे. यासाठीच लष्कराने थेट रस्त्यांवरच दारूगोळा आणि सुरुंग पेरले आहेत. ही बाब कळताच जीव वाचवण्यासाठी हजारो नागरिक सैरभैर धावत आहेत. याबद्दल संयुक्त राष्ट्राने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे स्वतंत्र मानवाधिकार तज्ज्ञ टॉम अँड्र्यूज यांनी म्यानमारमधील लष्करी राजवटीतील नरसंहार रोखण्यासाठी लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय कारवाईची मागणी केली आहे. लष्कराकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी म्यानमारमधील हजारो नागरिकांनी सीमेवरच्या इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्याच काहींनी जंगलाच घरे बनविली आहेत. परंतु तेथे त्यांच्याकडे सर्व आवश्यक गोष्टींचा अभाव आहे. यामुळे त्याच्या जीवावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.










