बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मंत्रालयाच्या कामकाजात होणार अमुलाग्र बदल; महाराष्ट्रदिनापासून होणार प्रारंभ

by Gautam Sancheti
एप्रिल 10, 2023 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Mantralay

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी मुंबईत मंत्रालयात गेल्यावर आपले काम होईल, या अपेक्षेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी मंत्रालयासमोर गर्दी करतात. अनेक जाचक नियम असूनही मंत्रालयात प्रवेश मिळावा, यासाठी त्यांची खटाटोप सुरू असते. परंतु आता यापुढे मंत्रालयात होणाऱ्या प्रचंड गर्दीला आळा किंवा अटकाव घालण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच सर्वसामान्य जनतेची निवेदने आणि पत्रे स्वीकारली जाणार असून त्या ठिकाणी त्यांचे स्कॅनिंग करून संबंधित विभागात किंवा मंत्र्यांच्या खात्याकडे पाठविली जाणार आहेत. त्यानंतर लगेचच या पत्राची पोहच संबंधित नागरिकाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिन म्हणजेच एक मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तसेच संबंधित मंत्र्यांना पत्र देण्याच्या निमित्ताने तसेच त्यांचे शिफारस पत्र मिळविण्याच्या निमित्ताने दररोज हजारो नागरिक मंत्रालयात फेरफटका मारतात.विशेषतः मंगळवार-बुधवारी मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी अधिक असते. या दिवशी जवळपास दीड ते दोन हजार व्यक्तींना शिफारस पत्रावर मंत्रालयात प्रवेश दिला जातो, तसेच सर्वसामान्य परिस्थितीतही दीड ते दोन हजार व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. इतक्या अभ्यागतांना प्रवेश द्यायचाच असेल तर शिफारस पत्राचे सोपस्कार कशाला, असा प्रश्न आता केला जात आहे.

मुंबईत आधीच प्रचंड गर्दी त्यात मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि दैनंदिन कामात येणारा अडथळा रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल रजिस्ट्री युनिट उभारले जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत ३७ विभागांची दररोजची सुमारे ४० हजार पत्रे प्रवेशद्वारावरील याच युनिटमध्ये स्वीकारली जाणार आहेत. कारण मंत्रालय, नवीन प्रशासन भवन इमारतीत राज्यातील कानाकोपऱ्यांतून नागरिक आपली कामे मार्गी लागावीत म्हणून येत असतात. तसेच मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी क्षेत्रिय पातळीवरील कार्यालयातून अधिकारी-कर्मचारी मंत्रालयात बैठकीसाठी येत असतात. त्या दिवशी मंत्रालयात प्रचंड गर्दी असते. तसेच बदल्यांच्या हंगामात विशेषतः मार्च, एप्रिल महिन्यांत मंत्रालयात भरपूर गर्दी असते. अशावेळी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून काही नियमानुसार मंत्रालयात आणि नवीन प्रशासकीय भवनात प्रवेश दिला जातो.

सध्या मंत्रालयात तात्पुरत्या कामानिमित्त येणाऱ्यांना सध्या ‘गार्डन गेट’ येथूनच प्रवेश दिला जात आहे. कधी कधी या प्रवेशद्वारावर सकाळी ११ ते दुपारी १ च्या सुमारास येथे झुंबड उडालेली असते. प्रवेशाकरिता सगळ्यांची भिस्त मंत्री कार्यालयातून मिळणाऱ्या शिफारस पत्रावर असते. बरेचदा शिफारस पत्र नसेल तर प्रवेश मिळविणे सर्वसामान्यांकरिता जिकिरीचे बनते. येथील सर्व कार्यालयावरही या प्रक्रियेचा ताण येत आहे. अनेकदा मंत्र्यांच्या खासगी सचिवांना या कामासाठी कार्यालयात थांबून राहावे लागते. कारण, त्यांच्या सहीच्या पत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यावर उपाय म्हणून या ठिकाणच्या खिडक्यांवर तत्काळ ही पत्रे स्कॅन होऊन थेट संबंधित विभागात पोहोचणार असून त्याचे ‘टोकन’ पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर मिळणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ होईल.

हजारो तक्रारी, अर्ज, निवेदने यांचा खच मंत्रालयात पडत असतो. या पत्रांचे विलगीकरण करून संबंधित विभागाला पाठविण्याचे आणि त्या पत्रांना उत्तर देण्याचे मोठे जिकिरीचे काम येथील टपाल विभागाकडून पार पाडले जाते. तसेच मंत्रालयाचा कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय टपाल यंत्रणा (सेंट्रल रजिस्ट्री युनिट) प्रवेशद्वारावर उभारली जात आहे. या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारली जात आहे. प्रवेशद्वारावरील सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये आल्यानंतर ज्या विभागातील खिडकीवर पत्र येईल ते अत्याधुनिक स्कॅनरवर तत्काळ स्कॅन हाेईल. त्यानंतर या पत्राचा टोकन नंबर तयार होईल, तो पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येईल. त्यानंतर या पत्राची स्कॅन कॉपी संबंधित विभागाकडे जाईल. त्यानंतर पत्रावर नेमकी काय कार्यवाही सुरू आहे, हे पत्र देणाऱ्या व्यक्तीला अगदी गावात बसूनही संबंधित वेबसाइटवर टोकन नंबर टाकताच कळणार आहे, असे सांगण्यात येते.

Mumbai Mantralay Work Big Changes Maharashtra Day

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पारंपरिक खेळ खेळण्याकरिता मुलींसाठी इनडोअर स्टेडियम उभारणार; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Next Post

असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र… खरबूज लागवडीतून असा होतोय फायदा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर…राजकीय चर्चेला सुरुवात

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

सप्टेंबर 10, 2025
T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Next Post
5 1140x570 1

असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र... खरबूज लागवडीतून असा होतोय फायदा...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011