सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष मुलाखतीमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या विविध प्रकल्पाबाबत दिली ही माहिती ( बघा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 14, 2022 | 3:56 pm
in स्थानिक बातम्या
0
hemant godse e1598937277337

 

नाशिक – मुंबई – पुणे – नाशिक हा सुवर्णत्रिकोण आहे. मुंबईच्या सारख्या अंतरावर पुणे आहे आणि २० वर्षांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला त्यानंतर पुण्याचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावरून कनेक्टिव्हिटी किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. आणि आता नाशिकही लोहमार्ग, रस्तेमार्ग, हवाई मार्ग यांच्या माध्यमातून विकासाच्या उंबरठ्यावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दोन एअरपोर्ट जवळ नाही ते नाशिकमध्ये आहेत. शिर्डी आणि नाशिक हे एअरपोर्ट एकमेकांपासून ५५ किमी अंतरावर आहेत.नाशिक एअरपोर्टच्या माध्यमातून ६ मोठ्या शहरात कनेक्टिव्हिटी मिळवण्यात यश आलं आहे, असे मत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले.

गेल्या ७ वर्षांचा त्यांच्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले की, नाशिक मुंबई या सहापदरी रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रोजेक्ट आपल्यासाठी वरदान ठरणार आहे. नाशिक मुंबई, मुंबई पुणे तसेच नाशिक पुणे या नवीन रेल्वेलाइनसाठी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या लोहमार्गामुळे आपण सुवर्णत्रिकोणात पूर्ण होणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, इन्फ्रास्ट्रक्चर आले तर रोजगार निर्मिती होते आणि त्यातूनच विकास होतो. रोजगारनिर्मिती विषयी बोलताना ते म्हणाले की, इंडस्ट्रीअल विकास हा महत्वाचा आहे. यासाठी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न आहे. या अंतर्गत सिन्नर, इगतपुरी हे भाग सुद्धा कव्हर होतील. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद ला हा प्रोजेक्ट गेला. नाशिकला पाणी नाही म्हणून आपल्याला नाकारलं. खर म्हणजे नाशिक मधून औरंगाबादला पाणी पुरवठा होतो आणि आपल्यालाच त्या मुद्द्यावरून नाकारलं, ही खंत आहे. पण आता नदीजोड प्रकल्प सुरू केले आहेत. त्या माध्यमातून इंडस्ट्रीसाठी जे पाणी लागणार आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी राज्यशासन जागा उपलब्ध करून देत आहे तर केंद्रशासन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून देत आहे यातून काही वर्षात नाशिकला मोठ्या प्रमाणावर नक्की रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी दाखवला.

इंजिनिअरिंगचे अनेक विद्यार्थी पुणे, बंगलोरला जातात. आपल्याकडच टॅलेंट बाहेर जातं पण आता लवकरच नाशिकला आयटी पार्क साकारणार आहोत. सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग ही संस्था आता नाशिकला येणार आहे. ही संस्था आधी पनवेल इथे उभी राहणार होती पण जागेअभावी तिथे शक्य नाही म्हणून केंद्राला नाशिक हा पर्याय सुचवला आणि त्याला मंजुरी मिळाली. या माध्यमातून दरवर्षी  २००० मुलांना नोकरी मिळेल.

मेट्रोविषयी त्यांनी सांगितले की, युतीच्या काळात मेट्रोची घोषणा केली. त्या प्रस्तावावर केंद्राने काही त्रुटी सुचवल्या. पुन्हा हा प्रस्ताव राज्याकडे आला. त्याचा पाठपुरावा केला. त्याची पूर्तता करून केंद्राच्या नगरविकास खात्याकडे पुन्हा प्रस्ताव पाठवला. मागच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या मेट्रोची घोषणा केली होती. केंद्रासरकारकडून अंतिम मान्यता मिळाली की हे काम लवकरच सुरू होईल. यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा मार्ग सुरळीत होईल. सलग दोनदा खासदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास त्यांच्या नावावर आहे त्याविषयी ते म्हणाले की, या काळात लोकसंपर्क ठेवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केला. लोकप्रतिनिधी या नात्याने मी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांच्या विश्वासामुळे हा इतिहास घडू शकला, असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Next Post

सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यानंतर स्टेट बँकेने केला हा खुलासा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यानंतर स्टेट बँकेने केला हा खुलासा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011