इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत रेल्वे दुर्घटनेत ६ प्रवाशाचा मृत्यू झाला तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णलायात उपचार सुरु आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जातांना लटकलेले प्रवासी घासले गेले. त्यात ८ प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले.
सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. त्यात ही दुर्घटना मुंब्रा दिव्या दरम्यान घडली.
सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबध नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.
या दुर्घटनेनंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. मुंब्रा कळवा येथील घटना दुर्दैवी आहे. ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे आणि त्याच बरोबर ठाणे बायपास करून दिवाला डायरेक्ट रेल्वे कनेक्शन, सगळे डब्बे १५ डब्याचे करून, क्षमता वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला २-५ वर्ष लागणार. अश्या वेळेला प्रवाश्यांनी ही शिस्त पाळावी एवढीच विनंती..