रविवार, नोव्हेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदी सरकारची दमदार कामगिरी; ९ वर्षात रद्द केले तब्बल एवढे कायदे

एप्रिल 9, 2023 | 3:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
image003EEQB

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुशासन आणि व्यवसाय सुलभतेसाठी, गेल्या ९ वर्षात २००० हून अधिक कालबाह्य नियम आणि कायदे रद्द केले गेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन व अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केले. यशराज रिसर्च फाउंडेशनने (YRF) आयोजित केलेल्या यशराज भारती सन्मान (YBS) पुरस्कार या ‘कृतज्ञता समारंभात’ पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पूर्वीच्या सरकारासारखे सुस्त आणि आराम करत रहाण्याऐवजी, पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांची गैरसोय करणाऱ्या आणि ब्रिटीश राजवटीपासून चालत आलेल्या अनेक नियमांना दूर करण्याचे धाडस व विश्वास दाखवला; ज्या सुशासनाचे अंतिम उद्दिष्ट हे नागरिकांचे राहणीमान सुलभ करणे हेच आहे.

विविध व्यक्ती आणि संस्थांनी विविध क्षेत्रात केलेल्या अनुकरणीय कार्याची दखल घेत यशराज भारती सन्मान (YBS) पुरस्कार केल्याबद्दल यशराज रिसर्च फाऊंडेशनची (YRF) सिंह यांनी प्रशंसा केली. ज्या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, त्या म्हणजे आरोग्यसेवेतील नाविन्य, लोकांच्या जीवनात परिवर्तन आणि नैतिक प्रशासन; या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहमीच प्राधान्य दिलेल्या श्रेणी आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

मे २०१४ मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच राजपत्रित अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रथा बंद करण्यात आली होती, यांचे स्मरण सिंह यांनी केले. त्यानंतर वर्षभराच्या आत, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून नोकरीच्या भरतीतील मुलाखती रद्द करण्यास सांगितले, जेणेकरुन समान संधी प्रदान करता येतील. निवृत्ती वेतन देताना चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले गेले; जेणेकरुन ज्येष्ठ नागरिकांना जीवन प्रमाणपत्र मिळविण्याच्या त्रासदायक प्रक्रियेतून जावे लागू नये. बहुतेक कामकाज ऑनलाइन व्यवहारात रूपांतरित केले गेले आणि पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा सहभाग आणण्यासाठी मानवी कामकाज कमीत कमी करण्यात आले.

तक्रार निवारणाबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, तक्रार निवारण यंत्रणा सीपीग्राम्समधे (CPGRAMS) हलविण्यात आली होती, ज्याचा परिणाम म्हणून हे सरकार येण्यापूर्वी दरवर्षी पूर्वीच्या केवळ दोन लाखांच्या तुलनेत दरवर्षी सुमारे २० लाख तक्रारी प्राप्त होत आहेत आणि यात सरकारने कालबद्ध निवारण धोरणाचा अवलंब करत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात, मंत्री म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात तंत्रज्ञान आणि टेलिमेडिसिनच्या वापराने दुर्गम व ग्रामीण भागात आरोग्यसेवा कशी पोहोचवता येते, हे दाखवून दिले आहे.

या सरकारने आरोग्य क्षेत्रात देखील केवळ तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना चालना दिली, एवढेच नाही तर नवनवीन शोध हाती घेण्यासाठी स्टार्टअप्सनाही प्रोत्साहन दिले आहे; ज्यामुळे नागरिकांच्या जीवनात परीवर्तन झाले आहे.

पूर्वीच्या सरकारचे प्राधान्यक्रम चुकीचे होते आणि सत्तर वर्षे ते चुकीच्याच स्थानावर राहिले, कारण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सरकार चालविले जात होते, असा निष्कर्ष आपल्या भाषणात अखेरीस डॉ जितेंद्र सिंग यांनी काढला. इतक्या वर्षात जे व्यवस्थित व्हायला हवे होते ते ९ वर्षांत प्रथमच पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधानांचा संदेश देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या यशराज रिसर्च फाउंडेशनच्या (YRF) प्रयत्नांबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला.

Modi Government Last 9 Years Laws Cancelled

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Next Post

अचानक ट्विस्ट! फडणवीस दिल्लीऐवजी थेट अयोध्येत दाखल; नेमकं काय घडतंय?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
FtQgoDsaQAAQ2Am

अचानक ट्विस्ट! फडणवीस दिल्लीऐवजी थेट अयोध्येत दाखल; नेमकं काय घडतंय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011