मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी सरकारची दमदार कामगिरी; ९ वर्षात रद्द केले तब्बल एवढे कायदे

by Gautam Sancheti
एप्रिल 9, 2023 | 3:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
image003EEQB

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुशासन आणि व्यवसाय सुलभतेसाठी, गेल्या ९ वर्षात २००० हून अधिक कालबाह्य नियम आणि कायदे रद्द केले गेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन व अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केले. यशराज रिसर्च फाउंडेशनने (YRF) आयोजित केलेल्या यशराज भारती सन्मान (YBS) पुरस्कार या ‘कृतज्ञता समारंभात’ पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पूर्वीच्या सरकारासारखे सुस्त आणि आराम करत रहाण्याऐवजी, पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांची गैरसोय करणाऱ्या आणि ब्रिटीश राजवटीपासून चालत आलेल्या अनेक नियमांना दूर करण्याचे धाडस व विश्वास दाखवला; ज्या सुशासनाचे अंतिम उद्दिष्ट हे नागरिकांचे राहणीमान सुलभ करणे हेच आहे.

विविध व्यक्ती आणि संस्थांनी विविध क्षेत्रात केलेल्या अनुकरणीय कार्याची दखल घेत यशराज भारती सन्मान (YBS) पुरस्कार केल्याबद्दल यशराज रिसर्च फाऊंडेशनची (YRF) सिंह यांनी प्रशंसा केली. ज्या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, त्या म्हणजे आरोग्यसेवेतील नाविन्य, लोकांच्या जीवनात परिवर्तन आणि नैतिक प्रशासन; या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहमीच प्राधान्य दिलेल्या श्रेणी आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

मे २०१४ मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच राजपत्रित अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रथा बंद करण्यात आली होती, यांचे स्मरण सिंह यांनी केले. त्यानंतर वर्षभराच्या आत, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून नोकरीच्या भरतीतील मुलाखती रद्द करण्यास सांगितले, जेणेकरुन समान संधी प्रदान करता येतील. निवृत्ती वेतन देताना चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले गेले; जेणेकरुन ज्येष्ठ नागरिकांना जीवन प्रमाणपत्र मिळविण्याच्या त्रासदायक प्रक्रियेतून जावे लागू नये. बहुतेक कामकाज ऑनलाइन व्यवहारात रूपांतरित केले गेले आणि पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा सहभाग आणण्यासाठी मानवी कामकाज कमीत कमी करण्यात आले.

तक्रार निवारणाबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, तक्रार निवारण यंत्रणा सीपीग्राम्समधे (CPGRAMS) हलविण्यात आली होती, ज्याचा परिणाम म्हणून हे सरकार येण्यापूर्वी दरवर्षी पूर्वीच्या केवळ दोन लाखांच्या तुलनेत दरवर्षी सुमारे २० लाख तक्रारी प्राप्त होत आहेत आणि यात सरकारने कालबद्ध निवारण धोरणाचा अवलंब करत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात, मंत्री म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात तंत्रज्ञान आणि टेलिमेडिसिनच्या वापराने दुर्गम व ग्रामीण भागात आरोग्यसेवा कशी पोहोचवता येते, हे दाखवून दिले आहे.

या सरकारने आरोग्य क्षेत्रात देखील केवळ तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना चालना दिली, एवढेच नाही तर नवनवीन शोध हाती घेण्यासाठी स्टार्टअप्सनाही प्रोत्साहन दिले आहे; ज्यामुळे नागरिकांच्या जीवनात परीवर्तन झाले आहे.

पूर्वीच्या सरकारचे प्राधान्यक्रम चुकीचे होते आणि सत्तर वर्षे ते चुकीच्याच स्थानावर राहिले, कारण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सरकार चालविले जात होते, असा निष्कर्ष आपल्या भाषणात अखेरीस डॉ जितेंद्र सिंग यांनी काढला. इतक्या वर्षात जे व्यवस्थित व्हायला हवे होते ते ९ वर्षांत प्रथमच पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधानांचा संदेश देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या यशराज रिसर्च फाउंडेशनच्या (YRF) प्रयत्नांबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला.

Modi Government Last 9 Years Laws Cancelled

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Next Post

अचानक ट्विस्ट! फडणवीस दिल्लीऐवजी थेट अयोध्येत दाखल; नेमकं काय घडतंय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FtQgoDsaQAAQ2Am

अचानक ट्विस्ट! फडणवीस दिल्लीऐवजी थेट अयोध्येत दाखल; नेमकं काय घडतंय?

ताज्या बातम्या

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला हा स्पष्ट आदेश….

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
IMG 20250708 WA0417 1

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

जुलै 8, 2025
solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011