बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

६ वर्षांचा कार्यकाळ असताना मोदी सरकार दर वर्षाला निवडणूक आयुक्त का बदलते? सुप्रीम कोर्टात दिले हे प्रतिज्ञापत्र…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 24, 2022 | 5:34 am
in संमिश्र वार्ता
0
SC2B1

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगा संदर्भात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे याला कारण म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांच्या निवडीमध्ये पारदर्शता आणण्यासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडी या आताही पारदर्शक पद्धतीनेच केल्या जात असल्याचे उत्तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. केंद्रिय निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांची निवड ही पारदर्शक पद्धतीने केली जावी अशी टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या निवडींवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता केंद्र सरकारने उत्तर दिले आहे.

आपल्या देशात दरवर्षी वर्षभर कोणत्या ना कोणत्या निवडणूक होत असतात. या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतात. वास्तविक पाहता निवडणूक आयोगाच्या कामकाजासंबंधी पूर्वीच्या काळी फारशी माहिती नव्हती, परंतु सुमारे ३० वर्षांपूर्वी निवडणूक आयुक्त म्हणून टी. एन. शेषन यांनी कार्यभार घेतला होता, तेव्हापासून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत सर्वांनाच माहिती झाली.
निवडणूक आयोग ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.

निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग तयार होतो. ऑक्टोबर सन १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली. सन १९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते. तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. त्यामुळे केवळ काल्पनिक स्थितीच्या आधारे कॅबिनेटच्या निर्णयावर अविश्वास दाखवू नये, निवडणूक आयोगात सध्या केल्या जाणाऱ्या नियुक्त्या या योग्य आणि पारदर्शक पद्धतीनेच केल्या जात आहेत असेही उत्तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे.

महत्वाचे या आधी या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडी या पारदर्शक पद्धतीने केल्या गेल्या जाव्यात. तसेच त्याकरिता सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेत्यांची समिती तयार करण्यात यावी आणि त्यांच्याकडे या निवडीचा निर्णय सोपविण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यावर सुनावणी करताना म्हटलं की, राज्यघटनेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांची निवड कशा पद्धतीने करण्यात यावी यावर मौन बाळगले आहे.

आपल्या देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांसारखी पदेही अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावतात. त्यामुळे यांच्या निवडीमध्ये अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यात यावी. त्यामुळे या पदांवर सर्वोत्तम व्यक्ती बसेल. तसेच राज्यघटनेच्या संबंधीत कलमानुसार या संदर्भात नवीन कायदा बनवण्यात यावा. इतकेच नव्हे तर पंतप्रधानावर आरोप झाले तरीही निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, निवडणूक आयुक्त हे सक्षम असावेत असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

निवडणूक आयोगातील मुख्य आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांच्या निवडी या सर्वोच्च न्यायालयात ज्याप्रमाणे कोलॅजियम पद्धतीप्रमाणे निवड करण्यात येते, त्याप्रमाणे करण्यात याव्यात, तसेच त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकार त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तींची या पदांवर निवड करते असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठांसमोर सुनावणी सुरू असून त्या संदर्भातच केंद्र सरकारने हा खुलासा केला आहे असे म्हटले जाते.

https://twitter.com/_prashantkadam/status/1595285275298893825?s=20&t=ddq2WykdT9ORIjMnh4634w

Modi Government in Supreme Court on Election Commissioner Appointment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल एक कोटी रूपयांचा गुटखा जप्त; एफडीएची भिवंडीत मोठी कारवाई

Next Post

सराईत गुन्हेगाराकडे सापडले ३ पिस्तुल, चार जिवंत काडतुसे; दोघे जेरबंद

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

सराईत गुन्हेगाराकडे सापडले ३ पिस्तुल, चार जिवंत काडतुसे; दोघे जेरबंद

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011