रायपूर, झारखंड (इंडिया दर्पण ऑनलाईन वृत्तसेवा) – एखाद्या व्यक्तीची सामूहिकपणे हत्या करणे म्हणजेच मॉब ब्लिचिंग हा अमानुष प्रकार आहे. कारण एखाद्या व्यक्तीला जिवंतपणी ठार मारणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, मात्र देशभरात गेल्या काही वर्षांपासून असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या विरुद्ध कठोर कायदे करण्यात आले आहेत, तरी अद्याप असे प्रकार घडतच आहे. आता झारखंडमध्ये मॉब लिंचिंग कायद्यानंतर पहिली घटना समोर आली आहे. सिमडेगा येथील कोळेबिरा येथे जंगलातील झाडे तोडून विकल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले. ही घटना बेसरजरा गावाजवळ घडली. संजू प्रधान नावाचा ठार झालेला हा तरुण छपरीडिपा गावातील होता.
याबाबत संजूची आई धनमीत देवी यांनी सांगितले की, जेव्हा जमाव तिच्या मुलाला मारहाण करत होता, तेव्हा तिने आणि तिच्या सुनेने त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघेही विनवणी करत होते पण त्यांचे कोणी ऐकले नाही. मुलगा आरडाओरडा करत असताना जमावाने घराच्या कुंपणातील फलक कापून मुलाला जिवंत जाळले. तसेच ही घटना अत्यंत गंभीर आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीसांनी सांगितले.
वास्तविक मनाई असतानाही संजू प्रधान जंगलातून लाकूड तोडून विकायचा, असे गावकऱ्यांनी सांगितले. बंबळेकराच्या ग्रामसभेने त्यांना तसे करण्यास मनाई केली होती. ग्रामसभेने संजूला स्पष्ट इशारा देत आणि सांगितले की, हे खुंटकटी क्षेत्र शेतीयोग्य जमीन करण्यासाठी नसून येथे जंगल तोडणे अयोग्य आहे. त्यामुळेच त्यांनी ग्रामसभेच्या परवानगीशिवाय झाडे तोडली नाहीत.
वारंवार विरोध करून आणि समज देऊन देऊनही संजू झाडे तोडायचा आणि लाकूड विकायचा, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तीन दिवसांपूर्वी त्याने पुन्हा झाड तोडले होते. बांबळकेरा येथील ग्रामस्थांना ही माहिती मिळताच मंगळवारी सकाळी ग्रामसभा बोलावण्यात आली. यावेळी तीन तास चाललेल्या बैठकीनंतर गावकऱ्यांनी संजूला मारण्याचा निर्णय घेतला. यानंतर गावकऱ्यांनी एकजुटीने संजूचे बेसरजारा येथील घर गाठले. प्रथम त्याला घराबाहेर ओढून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जिवंत जाळला. या घटनेची माहिती मिळताच सिमडेगा, कोळेबिरा आणि टायपैतानगर या तीन पोलिस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळ गाठून गावाला वेढा घातला असून ते गावातच पोलीस तळ ठोकून आहेत. या घटनेनंतर सर्व गावात तणावाचे वातावरण आहे. परिसरातील शेकडो ग्रामस्थही जमले असून खून करणाऱ्या बांबळकेरा गावातील ग्रामस्थही तेथे जमा झाले.