रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘मंत्री म्हणूनही मोठं काम करु शकलो नाही’, मंत्री दत्तात्रय भरणे असं का म्हणाले?

by Gautam Sancheti
मे 14, 2022 | 10:11 pm
in राज्य
0
DSC 0737 750x375 1

 

सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मी गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना जेवढे चांगले काम केले तेवढे काम आज मंत्री असूनही करु शकलो नाही. जिल्हा परिषद अध्यक्षाने मनापासून काम केले तर रात्री चांगली झोप लागते. मात्र, मंत्रालयात असूनही तेवढी चांगली झोप लागत नाही, अशी स्पष्ट कबुली पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे अमृत महोत्सवानिमित्त आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

समारंभाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ईशाधिन शेळकंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यातूनच एक आदर्श गाव तयार होऊन आदर्श ग्रामपंचायती तयार होत आहेत. गावच्या प्रगतीसाठी सरपंच, ग्रामसेवक यांना महत्व आहे. त्यांनी विविध योजना गावात राबवून विकास करावा. कोणतेही काम पारदर्शिपणे केले तर गावाचा कायापालट होऊ शकतो. जिल्हा परिषदेने कोरोनाच्या काळात आरोग्य, शिक्षण तसेच विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. त्यामध्ये माझे गाव कोरोनामुक्त गाव’ ही जिल्ह्याची योजना महाराष्ट्रात राबविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळाला म्हणून तेथेच न थांबता आणखी जोमाने काम करावे. प्रत्येक नागरिकाने ग्राम विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबुराव जाधव, वैशाली सातेपुते, सुमन नेहतराव, बळीराम साठे, डॉ.निशिगंधा माळी, जयमाला गायकवाड, शिवानंद पाटील, अनिरुद्ध कांबळे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भूषविलेल्या पुष्पमाला जाधव यांचा पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत ज्या ग्रामपंचायतीने त्या योजनेंतर्गत चांगले काम करुन योजनेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तालुकास्तरीयमध्ये अक्कलकोट-भुरी कवठे, बार्शी-यावली, करमाळा-सरपडोह, माढा- जामगाव, पंढरपूर-पुळूज, मंगळवेढा-लवंगी, मोहोळ-पापरी, उत्तर सोलापूर-मार्डी, सांगोला-अकोला, दक्षिण सोलापूर-होटगी. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यामधील यशस्वी रित्या काम केलेल्या ग्रामसेवकांना सन 2017-2018 ते 2020-2021 या कालावधीतील 44 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांनी आदर्श काम करावे, ग्रामीण खेडी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यसभा निवडणूकः छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून विजयी होतील का? असं आहे जागांचं गणित

Next Post

आंब्याची कोय फेकून देताय का? थांबा, आधी हे जाणून घ्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
mango seeds e1652592244431

आंब्याची कोय फेकून देताय का? थांबा, आधी हे जाणून घ्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011