रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शुभवार्ता! मध्यमवर्गीयांनाही मिळणार या सरकारी योजनेचा लाभ; मोदी सरकारच्या हालचाली

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 1, 2022 | 5:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
modi cabinet meet

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील ५५ कोटी गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान योजनेचा लाभ आता मध्यमवर्गालाही मिळू शकतो. सरकारने त्याची तयारी सुरू केली असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. आयुष्मान भारत अंतर्गत १०.७४ कोटी कुटूंबांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार सेवा सध्या देण्यात आली आहे. केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान भारतमध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेवर काही महिन्यांपूर्वी विचारमंथन सुरू झाले होते. मध्यमवर्गाला आपल्या कक्षेत आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.

यातील नियमांनुसार वार्षिक उत्पन्न लक्षात घेण्याबरोबरच ते संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत याचा लाभ मिळू शकतो. परंतु, प्राधान्य खाजगी कंपन्या आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना मध्यमवर्गीयांना असणार आहे. यासाठी सरकार खासगी कंपन्यांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना थेट आयुष्मान भारत योजनेशी जोडण्याचा पर्याय खुला करू शकते. याचा फायदा असा होईल की, या खाजगी कंपन्यां त्यांच्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प प्रीमियममध्ये आरोग्य संरक्षण देऊ शकतील. अनेक कंपन्या आरोग्य विमा प्रदान करण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रीमियम आकारतात. अशा परिस्थितीत आयुष्मान भारत योजनेत थेट सामील होण्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना दिला जाऊ शकतो.

गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने केंद्रीय निमलष्करी दलांना आयुष्मान भारत योजनेशी नुकतेच जोडण्यात आले आहे आणि तेथे कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहे. तर मध्यमवर्गीयांना आयुष्मान भारतशी जोडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. २०१८च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयुष्मान भारत योजनेची घोषणा केली होती. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक – आर्थिक जनगणनेच्या आधारे १०.७४ कोटी कुटूंबांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत या योजनेतील एक तृतीयांशपेक्षा कमी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे. याअंतर्गत ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ १७.३५ कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. कोरोनामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा भार पडल्यानंतर, सरकार आता लाभार्थी शोधण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर आयुष्मान कार्ड देण्याची मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिला व बालकांच्या विकासासाठी आता प्रत्येक जिल्ह्याला ३ टक्के निधी; शासन निर्णय प्रसिद्ध

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा सुऱ्याची बायको म्हणते…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
laugh2

इंडिया दर्पण - हास्य षटकार - जेव्हा सुऱ्याची बायको म्हणते...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011