शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदींचा आता मास्टरस्ट्रोक! देशात १ ऑक्टोबरपासून होणार हे महत्त्वाचे बदल

कामाचा आठवडा आता केवळ चार दिवसांचा; तीन दिवस मिळणार सुटी

by Gautam Sancheti
जुलै 29, 2021 | 11:49 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 2021312104139

नवी दिल्ली – देशातील पाच महत्त्वाच्या राज्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणूक यादृष्टीने आता मोदी सरकारने रणनिती सुरू केली आहे. नोटबंदी सारख्या निर्णयातून संपूर्ण देशात खळबळ माजविणाऱ्या मोदींनी आता देशातील कामकाजाच्या बदलाबाबत मोठा निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून हा बदल लागू होण्याची दाट शक्यता आहे.

येत्या एक ऑक्टोबरपासून नवा श्रम कायदा लाग करून केंद्र सरकार देशभरातील कर्मचार्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. कायद्याची अंमलबजावणी होताच चार दिवसांचा आठवडा होणार आहे. नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार पीएफमधील रक्क वाढण्याची शक्यता आहे. हा नियम एक एप्रिलपासून लागू होणार होता. परंतु याबाबत राज्यांची सहमती न झाल्याने निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होऊ शकते. नव्या श्रम कायद्यामुळे कर्मचार्यांवर काय परिणाम होणार आहे, आपण हे जाणून घेऊयात.

आठवड्यात तीन दिवसांची सुट्टी
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानुसार, कर्मचार्यांना ९ तासांऐवजी १२ तास ड्यूटी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रत्येक पाच तासानंतर अर्धा तासाचा ब्रेक मिळेल. आठवड्यातील ४८ तास काम करावे लागेल. आठ तासाचे काम करणार्या कर्मचार्याला आठवड्यात सहा दिवस काम करावे लागेल. एका दिवसात १२ तास काम करणार्या व्यक्तीला आठवड्यात तीन दिवसांची सुट्टी मिळेल.

पीएफ वाढणार, पगार कमी
नव्या कायद्यानुसार पगाराच्या आराखड्यातही बदल होणार आहे. या कायद्यानुसार कर्मचार्यांचा बेसिक पगार ५० टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक आहे. अशा कर्मचार्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफचा हप्ता वाढणार आहे. मात्र हातात मिळणार्या पगारात घट होणार आहे.

संघटित, असंघटित कामगारांनाही दिलासा
नव्या श्रम कायद्यानुसार, देशभरातील कर्मचार्यांना आता कमीत कमी पगार देणे आवश्यक आहे. स्थलांतरिक मजुरांना डोळ्यासमोर ठेवून या कायद्याची रचना केली आहे. यामध्ये कर्मचार्यांना सामाजिक संरक्षण मिळणार आहे. देशभरातील संघटित आणि विनासंघटित क्षेत्रातील कामगारांना कर्मचारी राज्य विम्याचा लाभ मिळणार आहे. महिलांना रात्रपाळी करण्याची परवानगीही मिळणार आहे.

उतारवयात आधार
निवृत्तीनंतर आपले काय होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. नव्या कायद्यामुळे पीएफमध्ये वाढ होणार आहे. पीएफच्या नियमांनुसार कर्मचार्यांसह कंपनी अथवा कार्यालयालाही तेवढीच रक्कम जमा करावी लागते. त्यामुळे पीएफमधील रक्कम वाढणार आहे. या कायद्यामुळे एकीकडे कर्मचार्यांना फायदा होणार आहे, तर कंपन्यांवर भार पडणार आहे. निवृत्तीनंतर कर्मचार्यांच्या हातात मोठी रक्कम पडण्याची शक्यता आहे.

सुटीमुळे अर्थव्यवस्थेला चालना

तज्ज्ञांच्या मतानुसार आठवड्यातून ३ दिवसांची सुटी मिळाल्यास कामगार आणि कर्मचारी हे पर्यटन व खरेदीला प्राधान्य देतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होईल. कोरोनामुळे बेजार झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा निर्णय प्रभावी ठरु शकतो. एक पर्यटक घराबाहेर पडला तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ७ ते ८ जणांना रोजगार मिळतो. तसेच, सुटी असल्याने विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतील. ही बाब देशांतर्गत आर्थिक चलनवलन घडून येण्यास महत्वाची ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल १२ फुटी मगर बघितली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा

Next Post

नाशिक जिल्ह्यातील केवळ एकच धरण १०० टक्के भरले; अन्य धरणांना प्रतिक्षाच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250919 WA0256 1
स्थानिक बातम्या

शेतीतल्या नवदुर्गा’ व्हिडिओ मालिकेतून उलगडणार ‘ती’च्या जिद्दीचे रंग

सप्टेंबर 19, 2025
Untitled 27
स्थानिक बातम्या

नाशिकच्या या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना मिळाली ABB ची ग्लोबल शिष्यवृत्ती

सप्टेंबर 19, 2025
note press
संमिश्र वार्ता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जाणार…झाला हा करार

सप्टेंबर 19, 2025
cbi
महत्त्वाच्या बातम्या

सीबीआयने अनिल अंबानीशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये केले आरोपपत्र दाखल…२७९६ कोटींच्या घोटाळयाचा असा रचला कट

सप्टेंबर 19, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद…या विषयावर झाली चर्चा

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250918 WA0276 e1758249257199
स्थानिक बातम्या

नाशिक एफडीएची धडक कारवाई…४३ हजाराचा बनावट पनीर व खव्याचा साठा जप्त

सप्टेंबर 19, 2025
cricket
स्थानिक बातम्या

रणजी ट्रॉफी सराव.. नाशिकच्या सत्यजित बच्छावची या सामन्यात ५ बळींसह अष्टपैलु चमक

सप्टेंबर 19, 2025
Untitled 26
मुख्य बातमी

भारतातील या ७ नैसर्गिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश…महाराष्ट्रातील या स्थळालाही स्थान

सप्टेंबर 19, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्ह्यातील केवळ एकच धरण १०० टक्के भरले; अन्य धरणांना प्रतिक्षाच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011