मुंबई – कोरोनाची दुसरी लाट आता प्रत्येकाल स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत. जगभरातील तज्ज्ञांनी मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे दोनच उपाय असल्याचे म्हटले आहे. पण भारतात ते फारसे गांभिर्याने घेण्यात आलेले नाही, असे दिसत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तर हे दोन नियम न पाळणे दुसऱ्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे, असे म्हटले होते. सध्या तेच सुरू आहे.
तुम्ही एकट्यात असाल तरीही मास्क अनिवार्य आहे, असा निर्णय दोन दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. चालान कापण्याच्या निर्णायाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. दिल्ली सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
