विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवले आहे. या सुनावणीनंतर मोठे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि प्रमुख नेते व पक्षाध्यक्ष यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या अशा
अशोक चव्हाण, अध्यक्ष, मराठा आरक्षण उपसमिती
मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल लागेल याबाबत आम्ही पूर्ण आशावादी होतो, परंतु आता निकाल आला तरी त्यातून योग्य मार्ग काढू. सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुनही याबाबतच्या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात चांगले आणि निष्णात वकिलांनी युक्तीवाद केलाय. मराठा आरक्षण हे कसं योग्य आहे, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणे हे कसं बरोबर आहे, या सर्व मुद्द्यांमध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाही.
—