इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आंदोलनाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतरही त्यावर अजून संभ्रम कायम आहे. आता अॅड. योगश केदार यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी कुठे आहे याबाबत प्रश्न उपस्थिती केले आहे.
केदार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन दिवसांपासून सरकार कडे मी ५८ लाख नोंदी बाबत अधिकृत माहिती मागतोय- त्यात जुन्या किती अन या दोन वर्षात शोधलेल्या किती? ते म्हणतात आमच्याकडे तशी आकडेवारी उपलब्ध नाही. मग ही लोकं आपल्याला इतके दिवस खोटं बोलत होती का? याचा जाब विचारायला नको?
बरं आकडेवारी का विचारू नये? या लोकांनी दोन वर्ष आपल्याला भ्रमात ठेवले? पाटील बिचारे तेच तेच आकडे सांगत राहिले. ही समाजाची दिशाभूल नाही का? आज ओबीसीचे जाणकार लोक आपल्यावर हसत आहेत. शेवटी ही लढाई मुद्यांची आहे. सरकारला जाब तर विचारावाच लागेल. आपली लढाई सुद्धा भावनिक आगतिकतेतून बाहेर काढून संविधानिक मार्गाने चालली पाहिजे.