गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी केली उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 18, 2024 | 7:51 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 13

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम हे प्रामुख्याने शरद पवार यांनी केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज म्हणाले, की एका बाईला तीन मुले असतात. पहिल्या मुलाचे लग्न होते. त्या वेळी सासू आणि सुनेचे भांडण होते आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. भांडखोर सून होती, म्हणून सासूसोबत भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचे लग्न होते. दुसरी सून घरी येते. या वेळी दुसऱ्या सुनेचेदेखील सासूसोबत भांडण होते. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगादेखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळते, की तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता, तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे.

शिवसेनेची सासू बसली आहे ना, तिचा प्रॉब्लम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. या लोकांनी तुमचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात २०१९ पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस तो म्हणजे उद्धव, अशी टीका राज यांनी केली. सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले, त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, अशी टीका राज यांनी केली आहे.

राज यांनी लालबाग येथे बोलत असताना पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे ते म्हणाले. फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर चालू झाले आहे, या टीकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, ग्रामीण भागातील मुले मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात. मुंबई-पुण्यातील मुले विदेशात जायचे बघतात. आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. अनेक विषय आहेत, या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्याने हे लोक तुमचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी किंवा तुमचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून काही गोष्टींची सोय करून ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्या पद्धतीचे राजकारण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राजकारण चालते, तसे महाराष्ट्राचे होऊ नये. अत्यंत भीषण आणि घाण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. महाराष्ट्रातला एकोपा, आमच्या संतपरंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकत्र राहण्याची शिकवण, सर्व विसरून चाललोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी, अशी टीका करून ते म्हणाले, की शिवसेना भाजपला मतदान केल्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली आणि ज्यांच्या विरोधात मांडीला मांडी लाऊन बसली, केवळ त्या खुर्चीसाठी. तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही वाटला हा? स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधकांच्या सोबत जाऊन आघाडी करत सत्ता स्थापन केली, असा टोला राज यांनी उद्धव यांना लगावला.

शरद पवार यांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले. तुमचे मित्र, तुमचा परिवार महाराष्ट्रात जिथे कुठे असतील, तिथे त्यांना सांगा किमान यातून तरी आता आपण महाराष्ट्र बाहेर काढू. मी माझ्या अनेक सभांमधून सांगितले उद्या मनसे असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस; हे सगळे पक्ष मेले तरी चालतील; पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे राज म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ राहुल गांधी यांचा मुंबईतून टोला

Next Post

या व्यक्तींनी नव्या खरेदींचा मोह टाळावा, जाणून घ्या, मंगळवार, १९ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

या व्यक्तींनी नव्या खरेदींचा मोह टाळावा, जाणून घ्या, मंगळवार, १९ नोव्हेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011