सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ज्यांना मतदान केले, त्यांना नाकारा, राज यांचा सल्ला; माणसांची किंमत नसलेल्यांना का निवडून देता?

नोव्हेंबर 9, 2024 | 11:37 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 13

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळः “राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही उमरखेडमध्ये झाली होती. शेतकरी आत्महत्या करतो, त्यांना बघायला कोणी येत नाही. त्यांचे कुटुंब काय करते, ते ही बघत नाही. कारण आता माणसाची काही किंमतच उरली नाही. आमची मनेच मेली आहेत. जर तुम्ही जिवंत आहात असे वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली, त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा”, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

ते यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघात बोलत होते. राज यांनी मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्यासाठी एक प्रचार सभा घेतली. यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर त्यांची सभा पार पडली. या वेळी त्यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. “मला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. या मतदारसंघात पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. उमरखेडमध्ये शेतकरी आत्महत्या करतात, हे बघायला कोणी आले नाही. त्यांचे कुटुंब काय कते हे बघायला कोणी आले नाही. कारण कोणालाच माणसाची किंमत उरली नाही. माणसाची किंमत देशात नाही. परदेशात जाऊन कळते. अमेरिकचे अध्यक्ष ओबामा हे पदावरून खाली उतरत असताना त्यांनी एक कायदा केला होता. जेवढे कुत्रे बॉम्बस्फोटात जातील, त्यांना तुम्हाला परत अमेरिकेत आणावे लागेल. ज्या देशात कुत्र्याची काळजी आहे तर माणसाची किती असेल?” असा सवाल राज यांनी विचारला.

“एवढ्या आत्महत्या होत आहे, त्यावर काहीच नाही. कारण आमची मनेच मेली आहेत. आमच्याकडे तरुण तरुणी जिल्हा सोडून जात आहेत. आमदार, खासदार यांना विचारत नाही. निवडणूक खेळ समजतात. निवडणूक झाली की आम्ही विसरून जाणार. यानंतर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होणार. आमची मनेच मेली आहेत, तुम्ही जर जिवंत आहात असे वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा”, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या. मी विकास कसा होतो, हे पाहिले आहे. मी नाशिकमध्ये रस्ते बनवले. किती वर्षे झाले पाहा, अजूनही ते तसेच आहेत. कंत्राटदारकडून टक्के घेणे बंद झाले की रस्ते चांगले होतात. मला रस्त्यात खड्डा दिसला, तर खड्ड्यात बांधून मारेन असा दम मी कंत्राटदारला दिला होता, असा किस्साही राज यांनी सांगितला.

सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त इच्छा पाहिजे. मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही; पण मला महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्ने नक्कीच पडतात. राज्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या मेंदूत कमतरता आहे, अशी टीका राज यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली…मोदी यांचा गांधी घराणे व काँग्रेसवर आरोप

Next Post

मोदी व शाह यांनी अवघा महाराष्ट्र लुटला…उद्धव ठाकरे यांचा हल्ला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
udhava

मोदी व शाह यांनी अवघा महाराष्ट्र लुटला…उद्धव ठाकरे यांचा हल्ला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011