मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शन करण्यास मनाई केल्यानंतरही ते बुधवारी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले. जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहचणार आहे. या सर्व घडामोडीनंतर मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदावरील आंदोलनासाठी पोलिसांनी परवाणगी दिली आहे. ही परवानगी सध्या केवळ एक दिवसासाठी असून त्यामध्ये अटीशर्थीही घालण्यात आल्या आहे. आदोलनाची वेळ ९ ते सायंकाळी ६ असणार आहे. त्यानंतर आंदोलकाला थांबता येणार नाही. विशेष म्हणजे या आंदोलनात पाच हजार आंदोलकांना उपस्थिती राहता येणार आहे. दरम्यान रात्री २ वाजता पारनेरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आली. आता ते शिवनेरी येथे दाखल झाले आहे.
पण, दुसरीकडे सरकारमधील वरीष्ठ मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करत आहे. गणेशोत्सवानिमित्त गर्दीमुळे कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारतर्फे मोर्चा मध्येच थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहे. रात्री याबाबतीत भेट झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र या चर्चेत काय नेमकं घडलं हे अद्याप समोर आलेले नाही. सरकारने परवानगी दिली असली तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर असलेल्यांची संख्या मोठी आहे. ती रोखणे शक्य नाही. त्यामुळे त्याबाबतही चर्चा सुरु आहे.
या अगोदर न्यायालयाने अधिका-यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचवेळी जरांगे यांनी निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबई सारखी पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे असे खंडपीठाने नमूद केले. पण, सरकारने आझाद मैदानावर काही अटी व शर्थी घालून परवानगी दिली. पण, प्रश्न कायम आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही कायदा संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत १०० टक्के जाणार असे सांगितले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या स्वीय सहाय्यकांकडून मोर्चा रोखण्यासाठी अगोदर प्रयत्न करण्यात आले. स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी सुध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्याचे बोलले जात आहे.