मनमाड – मनमाड – नांदगाव रोडवर असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भारत निवासस्थाना मध्ये दोन बंद घरांचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याने रहिवशासह परिसरातील नागरिकामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात होणाऱ्या छोट्या-मोठ्या चोरांनी धुमाकूळ घातला असून पोलिसा विषयी नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात मोशर्रफ मोहम्मद शकील अहमद वय -२७ यांनी फिर्याद दिली असून मनमाड-नांदगाव रोडवरील भारत पेट्रोलियमच्या भारत निवास स्थानामधिल इमारत ए-४ मधील घर क्रं १०१ आणि त्यांच्या शेजारी असलेल्या अनुप महेश्वरी यांचे इमारत क्रं ४०२ या दोन्ही घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ३० ग्रॅम सोने आणि ५५ हजार रोख असा एकूण १ लाख ७५ हजार रूपयेचा ऐवज लंपास केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून घटनास्थळी उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी भेट दिली. या प्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात भादंवि ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास प्र.पो.नि प्रल्हाद गिते करीत आहे.
दरम्यान भारत पेट्रोलियम या इंधन प्रकल्पातील अधिकारी या भारत निवासस्थानांमध्ये राहतात तसेच या निवासस्थानाला संरक्षण व तार कंपाउंड असून २४ तास सुरक्षारक्षकाचा खडाहारा कोणीही व्यक्ति आत प्रवेश करतांना कसून तपासणी केली जाते. तरी देखील आत मध्ये जाऊन अज्ञात चोरटे चोरी कसे करतात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर येथील रहिवशानी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तर यापूर्वीही दोन वेळेस मोठ्या चोर्या देखील याच भारत निवासस्थानामध्ये घडल्या असतानां त्यांचा कुठलाही तपास लागला नाही. त्यातच काल पुन्हा येथे चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. येथे कडक पहारा असतांना देखील आतमध्ये जाऊन अज्ञात चोरटेची चोरी करण्याची हिंमत झालीच कशी ? अशी चर्चा असून या तपासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.