नाशिक – कल्याण – नाशिक प्रवास दोन तासांचा व्हावा यासाठी प्रास्तावित मनमाड – इगतपुरी लोहमार्ग इगतपुरी ऐवजी कसा – यापर्यंत नेणे गरजेचे आहे . याविषयीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रव असून मेमूचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज खासदार गोडसे यांनी मुंबईत रेल्वे महाप्रबंधक भेट घेतली नाशिक-मुंबई यादरम्यानच्या प्रवासासाठी जिल्हावासियांचा वेळ आणि आर्थिक ब व्हावी , जिल्हावासियांच्या विकासासाठी आणि नाशिक-मुंबई हे अंतर कमीतकमी वेळेत कापण्यासाठी प्रस्तावित मनमाड-इगतपुरी रेल्वेलाईन इगतपुरी ऐवजी थेट कसा-यापर्यंत मेमूची लवकरात लवकर ट्रायल घ्यावी अशा सुचना खा गोडसे यांनी मुंबई येथील रेल्वेवे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली आहे .
नाशिक – कल्याण हे अंतर दोन तासाचे झाल्यास मुंबईला कमीत कमी वेळेत पोहचणे शक्य होणार आहे . यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या व्यावसायाला मोठी चालना मिळणार असल्याने या दरम्यानच्या लोकल सेवेसाठी खा गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत . गेल्या दोन वर्षांपूर्वी खा . गोडसे यांच्या प्रयत्नातून ई.एस.यु. ची चाचणी नाशिक कल्याण या दरम्यान घेण्यात आली होती . मात्र कसारा से इगतपुरी दरम्यान घाट व बोगद्यामुळे मोठा अडथळे येत आहेत . बँकर लावूनही हवी तशी ताकद मेमू च्या इंजिनला मिळत नसल्याने अखेर नाशिक – कल्याण लोकल सेवेला ब्रेक लागला आहे . यातून मार्ग काढण्यासाठी इमू ऐवजी मेमू मेट्रोचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन आहे .
नाशिक , मुंबई आणि पुणे हे अंतर अवघे दोनशे किलोमीटरचेच असून या तीनही शहरांना विकासाचा सुवर्ण त्रिकोण समजला जातो . मुंबई – पुणे या दोन शहरांची कनेक्टीव्हीटी अति जलद असल्याने दोन ही शहरांचा विकास झपाट्याने झाला आहे . मात्र त्या तुलनेत मुंबई – नाशिक दरम्यानची कनेक्टीव्हीटी जलद नसल्याने नाशिक शहराचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही . नाशिक – कल्याण लोकल सेवा हा जलद कनेक्टीव्हीसाठीचा महत्वपूर्ण पर्याय आहे . मात्र यात इगतपुरी – कसारा येथील घाट आणि बोगद्यामुळे विविध तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने हसू लोकलची अयशस्वी चाचणी यापूर्वी झालेली आहे . मनमाड – इगतपुरी रेल्वेलाईनचा प्रस्तावित प्रकल्प आहे . ही रेल्वेलाईन इगतपुरी ऐवजी कसा – यापर्यंत केल्यास बोगद्यांची रुंदी वाढवून मेमू चायणी यशस्वी होवू शकते . याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे . सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होणेकामी आवश्यक ती पावले उचलून मेमूची चाचणी घ्यावी अशी सुचना खा . गोडसे यांनी जिल्हा वासियांचा वेळ आणि आर्थिक बचत होण्यासाठी रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली आहे .