गुरूवार, नोव्हेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मनमाड-करंजवण पाणी पुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार? अशी आहे सद्यस्थिती (बघा व्हिडिओ)

मे 11, 2023 | 5:31 am
in स्थानिक बातम्या
0
20230510 113233 1

 

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-करंजवण पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी झाले आहे. सद्यस्थितीत ९० किलोमीटर पैकी २५ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे.

मनमाड शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने जीवनदायी ठरलेल्या करंजवण ते मनमाड थेट पाईपलाईनचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून ९० किलोमीटर अंतर असलेल्या पाईपलाईनचे काम अनेक अडथळे पूर्ण करत अवघ्या काही दिवसात २५ किलोमीटर पाईप लाईन टाकण्याच काम पूर्ण झाले आहे.

त्याचप्रमाणे धरणावरील जॅकवेलचे तसेच मनमाड जवळील फिल्टर प्लॉन्टचे काम जोरात सुरु असल्याने निर्धारीत वेळेच्या आत वर्ष भरात ही योजना पुर्णर्त्वास जाईल असा प्रयत्न आमदार सुहास कांदे यांच्या कडून सुरु आहे. ही योजना लवकरच पुर्ण झाल्यास महिन्यातून एकदा पाणी मिळणाऱ्या मनमाडकरांना दररोज पाणी मिळणार आहे.

तब्बल ३७५ कोटींच्या निधीतून ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. मनमाड शहर गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंजत आहे. पण, येथील पाणीप्रश्नाकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. पण, आ. सुहास कांदे यांनी या योजनेचा पाठपुरावा करुन ती मंजूर करुन त्याचे कामही सुरु केले. या योजनेतून शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकणार आहे.

रेल्वेचे मोठे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहारात पाण्याचा प्रश्न हा नेहमी कळीचा मुद्दा होता. सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांना शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. १९७४ साली या धरणाची निमिर्ती करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे तीस ते चाळीस हजार होती. त्यामुळे लोकांना रोज पाणी मिळत होते.

कालांतराने शहराची लोकसंख्या वाढत गेल्यामुळे १९८७ साली पालखेड धरणातून सुमारे ९ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुरू झाली. पालखेड धरणातून रोटेशनद्वारे पाटोदा साठवणूक तलावात पाणी घेतले जाते. तेथून पंपिंग करुन सदर पाणी वागदर्डी धरणात आणल्यानंतर शहरात वितरीत केले जाते. वागदर्डी धरणाची अगोदर ९० दशलक्ष घनफूट क्षमता होती. त्यानंतर सांडव्याची भिंत वाढविण्यात आल्यामुळे धरणाची क्षमता ११० दशलक्ष घनफूट झाली. असे असले तरी धरण बांधल्यापासून त्याच्यातून गाळ काढण्यात आला नाही. तर धरणाऱ्या पाणलोट क्षेत्राच्या स्त्रोताच्या ठिकाणीच अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आल्यामुळे हे धरण लवकर भरतच नाही. त्यामुळे ७४ किमी अंतरावर असलेल्या पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडच्या धरणाला पाणी रोटेशनद्वारे मिळते या पाण्यावरच शहराला पूर्णपणे अवलंबून रहावे लागते. पण, आता या योजनेमुळे थेट पाणी मिळणार आहे.

रेल्वेचे जंक्शन, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवण ठेवणारे डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑईल कंपन्यांचे प्रकल्प, आणि शीख धर्मियांच्या सुप्रसिद्ध गुरुद्वारेमुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख आहे. इतक्या वेगवेगळ्या अर्थांनी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. पण, पाण्यामुळे शहराचा विकास खुंटला होता. पण, आता या योजनेमुळे विकासाला चालना मिळणार आहे.

Manmad Karanjvan Water pipeline Project Current Status

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भगूरला होणार स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्क… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

Next Post

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ… आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
narhari zirwal

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ... आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011