इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राजकीय अस्थिरथेमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर दुस-या कोणत्या तरी नेत्यांची वर्णी लागेल असे बोलले जात होते. पण, केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
या कारणामुळे दिला होता राजीनामा
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा इम्फाळ येथील राजभवनात सुपूर्द केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाराच्या आगीत होळपणा-या मणिपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. या निर्णयापूर्वी एन बिरेन सिंग यांनी अगोदर दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. मणिपूर विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून १० फेब्रुवारी पासून सुरु होणार होते. या अधिवेशनात विरोधक मणिपूर सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते. पण, त्यापूर्वीच एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

