अजय सोनवणे, मालेगाव
मालेगाव – मनसे नेते राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात असंसदीय भाषेचा वापर केला त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असंतोष आहे. त्यांनी सन्मानाने उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि उत्तर प्रदेशात जावे असा सल्ला भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी राज ठाकरे यांना दिला. साक्षी महाराज आज मालेगाव दौऱ्यावर आले असता बोलत होते. देशात आता हिंदू-मुस्लिम वाद संपला आहे. आता फक्त राष्ट्रवाद उरला असून मोदींच्या सबका साथ सबका विकास या नाऱ्याच्या माध्यमातून मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भाजपला जोडला गेला आहे. आज मी स्वतःआज एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात बसलो असल्याचा उल्लेखही खासदार साक्षी महाराज यांनी केला. मालेगावमध्ये खा.साक्षी महाराज यांचे जंगी स्वागत करण्यात आले.