मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वीज ग्राहकांना वीज नियाम आयोगाने मोठा शॅाक दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नवीन वीज दर आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियाम आयोगाने २८ मार्च २०२५ रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हा आदेश १ एप्रिल २०२५ पासून नव्या दरकपातीचा निर्णय लागू होणार होता. परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरने निदर्शनास आणले आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ग्राहकांना मिळालेला आनंद काही क्षणापुरताच राहिला आहे.
महावितरणच्या वकिलांनी यासंदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल २०२५ च्या अखेरीस सादर केली जाईल असे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने २८ मार्च २०२५ जाहीर केलेल्या नवी वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. महावितरणने तोटा होत असल्याचे सांगितल्याचे बोलले जात आहे.