शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारक येथे केला निषेध…उध्दव ठाकरे यांनी केली ही मागणी

by India Darpan
मार्च 6, 2025 | 4:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 18

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असे विधान केले. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. विधिमंडळातही त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भैय्याजी जोशी यांनी मराठीविरोधी केलेल्या विधानाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला तसेच हुतात्म्यांना अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, काल अनाजीपंत म्हणजे भैय्याजी जोशी येऊन गेले. त्यांनी मुंबईत येऊन सांगितले की मुंबईत राहणा-यांना मराठी आलेच पाहिजे असे नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन संघाचा हा छुपा अजेंडा आहे का? संघाचे दाखवण्याचे दात वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे का? बटेंगे तो कटेंगे म्हणतात. त्या बटेंगे ते कटेंगचा अर्थ म्हणजे हिंदु – मुस्लिम नाही. मराठी – अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा व्देष निर्माण करुन वाटणी करणार आहे. त्या अनाजीपंत यांनी मुंबईत जी अशी भाषा केली ती दक्षिण भारतात करुन दाखवावी गुजरातमध्ये करुन दाखवावी त्यानंतर महाराष्ट्रात सुखरुप येऊन दाखवावे असे आव्हान उध्दव ठाकरे यांनी केले.

भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी – अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी किती विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावून देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावर प्रांतरचना देशाची झाली. आता मुंबईची प्रांतरचना करत आहे. भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही!….भैय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

Next Post

भैय्याजी जोशी यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…

Next Post
Untitled 19

भैय्याजी जोशी यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011