शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर…आदित्यनाथ यांच्या विधानावर महाविकास आघाडीकडून भाजप लक्ष्य

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 6:41 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
yogi adityanath

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात येत आहे. ‘कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घोषणेवरून भाजपवर टीकास्र सोडले आहे. ते म्हणाले, की सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे. अर्थात तेच जातीयवादी आहेतच; पण या घोषणेने ते अधोरेखित केले आहे. निवडणुका येतात आणि जातात; पण दोन धर्मांमध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करता कामा नये; पण त्याचे भान भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांना नाही, अशी टीका पवार यांनी केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुऱ उद्धव ठाकरे यांनीही या घोषणेवरून भाजपला लक्ष्य केले. एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, की भाजपचे लोक आता ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहेत; मात्र आम्ही कुणाला कापूही देणार नाही आणि कुणाला महाराष्ट्र लुटूही देणार नाही.

दरम्यान, भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ला काँग्रेसने ‘जुडेंगे तो जितेंगे’ या घोषणेने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडून वातावरणनिर्मितीसाठी या घोषणेचा वापर केला जातो आहे. त्यामुळे भाजपच्या या घोषणेला काँग्रेसकडून ‘जुडेंगे तो जितेंगे’या घोषणेने प्रत्युत्तर दिले जाईल, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले

भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’या घोषणेपासून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या राज्यात अशा घोषणांना काहीच अर्थ नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनचोरीचे सत्र सुरूच…मखमलाबाद शिवारात चोरट्यांनी दोन मोटारसायकली पळवून नेल्या

Next Post

धक्कादायक…३१ वर्षीय युवकाची खत प्रकल्पा समोरील बाजूस निर्घृण हत्या

Next Post
crime 71

धक्कादायक…३१ वर्षीय युवकाची खत प्रकल्पा समोरील बाजूस निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011