इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतांना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मॅाक ड्रील घेण्याचे व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ७ मे रोजी हे मॅाक ड्रील होणार आहे. राज्यांनी पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश दिले आहे.या मॅाकड्रिलमध्ये बॅाम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या विविध परिस्थितीचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रात पुढील १६ ठिकाणी उद्या मॅाक ड्रिल होणार आहे. यात मुंबई, उरण- जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ – वायशेत, रोहा- धाटाव – नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी -चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शहराचा समावेश आहे.
गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार या गोष्टींचा सराव केला जाणार आहे.
हवाई हल्लाचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे
नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे
हल्ल्याच्या वेळी शहर, क्षेत्र ब्लॅकआऊट करणे (लाईट बंद करणे)
महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया
हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव