सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्राला मिळणार आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस; या मार्गांवर धावणार

by Gautam Sancheti
मे 25, 2023 | 2:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Vande Bharat Train

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. देशातील विविध शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहे. वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान धावणाऱ्या ट्रेनपैकी एक असून ही हाय स्पीड ट्रेन आहे. महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत.

वंदे भारतचा कमाल वेग १६० किमी/तास आहे. ही ट्रेन संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये ८० टक्के उत्पादने स्वदेशी बनवण्यात आली आहेत. या गाड्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजा आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे यांचा समावेश आहे.

आतापर्यंत भारतात विविध राज्यांमध्ये सुमारे १७ वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रातून ४ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आता आणखीन २ वंदे भारत ट्रेन धावणार असल्याने त्यांची एकूण संख्या ६ होणार आहे. आत्तापर्यंत मुंबईत तीन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यात मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर यांचा समावेश आहे. तर, नागपूर ते बिलासपूर या मार्गावर एक ट्रेन धावत आहे. आता मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल.

नागपूर ते हैदराबाद 
नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच सुरू होणार आहे. नागपूर आणि हैदराबादचे अंतर ५८१ किलोमीटर आहे. यासाठी सध्याच्या रेल्वेगाड्या साधारणपणे दहा तासांचा कालावधी घेतात. नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास हा कालावधी दहा तासांवरून साडेसहा तासांचा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा लाभ होणार आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची प्रतीक्षा होती.

सुधीर मुनगंटीवार सेवाग्राम येथे वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेसह पाचही जिल्ह्यांतील व्यापारी वर्गाला व नागरिकांना या रेल्वे सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. सकाळी सहा वाजता नागपूर स्थानकावरून नागपूर-हैदराबाद वंदे भारत रेल्वे सुटणार आहे. तर दुपारी साडेबारा वाजता हैदराबादला पोहोचेल. हैदराबादहुन दुपारी दीड वाजता ही एक्स्प्रेस निघुन रात्री आठ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

मुंबई ते गोवा
मुंबईला चौथी वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. मुंबईत आतापर्यंत तीन वंदे भारत गाड्या धावत असून त्या मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावत आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल. दरम्यान मंगळवारी मुंबई-गोवा मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भगत एक्स्प्रेस ट्रेनची चाचणी घेण्यात आली.

तिचा वेग १८०किमी प्रति तास वेग असून वंदे भारत ट्रेन मुंबईतील सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून सकाळी ५.३० वाजता निघेल आणि दुपारी १२.५० वाजता गोव्याच्या मडगाव स्थानकावर पोहचेल. त्यानंतर दुपारी १.१५ च्या सुमारास मडगावहून निघेल आणि रात्री ८.५० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. सध्या मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी ८ तास लागतात. त्याच वेळी, वंदे भारत सुरू होईल तेव्हा हा प्रवास फक्त ७ तासांचा असेल.

Maharashtra Will get Again 2 Vande Bharat Train

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव बाजार समितीची निवडणूक बिनविरोध; हे आहेत सभापती आणि उपसभापती

Next Post

त्र्यंबकेश्वरच्या नरभक्षक बिबट्याला होणार ही गंभीर शिक्षा; इतिहासातील पहिलीच घटना ठरणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
1684760920929

त्र्यंबकेश्वरच्या नरभक्षक बिबट्याला होणार ही गंभीर शिक्षा; इतिहासातील पहिलीच घटना ठरणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011