बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीत काय झालं?

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 15, 2023 | 7:17 pm
in मुख्य बातमी
0
SC2B1

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी झालेल्या युक्तिवादानुसार सत्तासंघर्ष सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. काल ठाकरे गटाने युक्तीवाद केला होता. आज शिंदे गटाच्यावतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला.

राज्यात एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदेखील जोर पकडू लागली आहे. शिंदे गट, ठाकरे गट, मविआ यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी सलग सुनावणी घेऊन सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद झाला.

बुधवारी झालेल्या सुनावणीबाबत अधिक सांगताना अनिल देसाई म्हणाले,‘शिंदे गटाच्या वकीलांनी कोर्टात युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी ४५ मिनिटे युक्तिवाद करताना नबाम रेबिया खटल्याचा निकाल राज्यातील सत्तासंघर्षाला लागू करावा, अशी भूमिका मांडली. राज्यपालांच्या बाजूने वकीलांनी कोर्टात बाजू मांडण्यात आली. प्रत्येक सदस्याचे हक्क आणि अधिकार यांच्याबाबत चर्चा झाली. आजच्या युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकमेकांशी चर्चाविनिमय करताना आढळले. रेबिया प्रकरणाचा निकाल आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यात विविध प्रकारचे मुद्दे आहेत. ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

काय म्हणाला ठाकरे गट?
२१ जूनला आमदार सुरतला निघून गेले होते. त्यानंतर पक्षाने बोलावलेल्या विधिमंडळ बैठकीस आमदार गैरहजर होते. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करून या आमदारांनी स्वेच्छेने पक्ष सोडल्याचे सिद्ध होते. यावरून ते निलंबनासाठी पात्र झाले आहेत, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला.
ही मागणी आली पुढे
रेबिया खटल्याची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्राचे प्रकरण गुंतागुंतीचे आहे. या प्रकरणाचा परिणाम देशातील लोकशाहीवर होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायामूर्तींकडे वर्ग करण्याची मागणी सुनावणीदरम्यान पुढे आली.

शिंदे गटाने केला हा युक्तीवाद
शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी आज युक्तीवाद केला. साळवे म्हणाले की, पक्षांतरबंदी कायद्यामुळे देशातील पक्षांतर थांबलेले नाही. हा कायदा पक्षांतरबंदीचा आहे. मतभेदांसाठी नाही. २१ जून २०२२ रोजी विरोधी विरोधी पक्षांमध्ये नेतेपदाची रस्सीखेच सुरू होती. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आला होता, पण तो पटलावर आला नाही. त्यामुळे उपाध्यक्ष काम करतच राहिले. अविश्वास प्रस्तावानंतरही उपाध्यक्षांकडून सदस्यांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली.

साळवे पुढे म्हणाले की, उपाध्यक्षांकडून त्यावेळी घेत असलेले निर्णय नियमबाह्य होते. नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नव्हता. उद्धव ठाकरे यांना ३० जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती. वेळ असतानाही त्यांनी राजीनामा का दिला? त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अर्थच उरत नाही. २८८ पैकी १७३ आमदार महाविकास आघाडीकडे होते, त्यातील केवळ १६ अपात्र ठरवले. त्यामुळे १६ आमदारांमुळे सरकार पडलेले नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती ओळखून राजीनामा दिला. इतर २२ आमदारांना नोटीस देण्यात आली नाही किंवा अपात्रेबाबत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यासाठी याचिकाही दाखल केली होती, असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Today
Politics Shinde Thackeray Shivsena

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात हा झाला निर्णय

Next Post

शरद पवारांना धक्का! जवळच्या व्यक्तीवर आयटीच्या धाडी; एकूण आठ ठिकाणी छापे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Aniruddha Deshpande e1676469792852

शरद पवारांना धक्का! जवळच्या व्यक्तीवर आयटीच्या धाडी; एकूण आठ ठिकाणी छापे

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011