रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बंडखोर मंत्र्यांची नुसती खाती काढून उद्धव यांनी काय साध्य केले? मंत्रिपदावरुन हकालपट्टी का नाही केली?

by Gautam Sancheti
जून 28, 2022 | 3:55 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
सग्रहित फोटो

सग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बंडखोर ९ मंत्र्यांकडील खाती काढून ती अन्य मंत्र्यांना देण्यात आली आहेत. मात्र, उद्धव यांनी यातून नक्की काय साध्य केले आहे. या बंडखोरांची थेट मंत्रिपदावरुन हकालपट्टी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद उसळला असून राजकारण ढवळून निघाले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी ला ३९ आमदार आणि ९ मंत्री आपल्याबरोबर नेल्यानंतर शिवसेनेकडे आता केवळ ४ मंत्री उरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरलेल्या मंत्रिमंडळात खातेवाटपात फेरबदल करावे लागले आहेत. या फेरबदलात शिवसेना तिसऱ्या नंबरवर पोहचली आहे.

शिंदे यांच्याशी सत्ता संघर्षात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत बंडखोरी करणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून घेतली असून या मंत्र्यांच्या खात्यांचा पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्याचा थेट फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना झाला आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील वर्चस्व आणखी वाढले आहे.

एखादा मंत्री आजारी असेल, अकार्यक्षम असेल किंवा त्याचे अपघाती निधन झाले तर खाते वाटपात फेरबदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्याच अधिकाराचा वापर उद्धव यांनी केला आहे. मात्र, हे करताना त्यांनी मोठी सावधगिरी बाळगली आहे. आपल्या कुठल्याही कृतीचा गैरफायदा शिंदे गटाने घेऊ नये याचा पूर्णपणे विचार उद्धव यांनी केला आहे. म्हणूनच बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवले आहे. कारण, नजिकच्या काळात कुठल्याही कायदेशीर किंवा वैधानिक अडचण किंवा समस्या समोर येऊ नये. मंत्रिपदावरुन काढले तर बंडखोरांना अधिक बळ मिळेल आणि पक्षानेच कारवाई केल्याचा कांगावा केला जाईल. ही बाब हेरुन बंडखोरांवर सावधगिरीने कारवाई केली जात आहे. केवळ खाती काढून बंडखोरांचे परतीचे दोर शाबूत ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Maharashtra Political Crisis Chief minister Uddhav Thackeray cabinet portfolio

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना; सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १ लाख ७८ हजार रूपयाचा गुटखा जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Next Post
crime diary 3

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १ लाख ७८ हजार रूपयाचा गुटखा जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011