शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

यामुळे रखडले राज्यभरातील व्यवहार! न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारकडून कार्यवाही नाही

by Gautam Sancheti
एप्रिल 23, 2023 | 3:43 pm
in संमिश्र वार्ता
0
court

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायालयाने एखाद्या प्रकरणात निकाल दिला तरीही प्रशासन त्यावर आपल्याच गतीने अंमलबजावणी करत असते. तुकडेबंदीच्या संदर्भातही प्रशासनाने अंमलबजावणीत कासवगतीचा मार्ग अवलंबल्याने राज्यभरातील हजारो नागरिकांचे व्यवहार ठप्प रखडले आहेत.

राज्याच्या मुद्रांक विभागाने गेल्यावर्षी जुलैमध्ये तुकडेबंदीचे परिपत्रक आणि महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ च्या नियम क्रमांक ४४ (९) (ई) नुसार तुकडाबंदीचे परिपत्रक आणि नियम जारी केले. त्यामुळे एनए ४४ वगळता सर्व घरे, जागा, शेतीमधील तुकडा, प्लॉटची रजिस्ट्री बंद आहे. सध्या फक्त नगर रचना विभागाने मंजूर केलेल्या ले-आऊटप्रमाणेच रजिस्ट्री होत आहे.

दरम्यान या विरोधात याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तर शासनाने काढलेले तुकडाबंदीचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द करून नोंदणीसाठी आलेले दस्त परिपत्रकामुळे नाकारू नये, असे आदेश दिले होते. मात्र खंडपीठाच्या या निर्णयाला राज्य शासनाने आव्हान दिले.

परंतु औरंगाबाद खंडपीठाने 13 एप्रिल रोजी शासनाचे आव्हान फेटाळून लावले. त्यानंतर शासनाने यासंदर्भात आदेश काढणे अपेक्षित होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतरही शासनाने आदेश न काढल्याने नागरिकांचा संताप बघायला मिळत आहे. सरकारच्या या कार्यपद्धतीचा फटका ग्रामीण भागातील लोकांना जास्त बसत आहे.

सरकारचीच आडकाठी
१३ एप्रिलला न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळून लावत परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच या प्रकरणात राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची मुभा दिली. मात्र, शासनाने या प्रकरणात अद्याप कुठलिही भूमिका घेतली नाही. तसेच कोणतेही आदेशही काढले नाही. त्यामुळे प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात शासनाचीच आडकाठी ठरत असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्याने काय करावे?
शासनाच्या या परिपत्रकानुसार गुंठ्याने जमीन विकता येत नाही. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी घरातील लग्नकार्य, घर बांधणे यासह सुख दुःखात थोडीफार जमीन विकून आपले काम करून घेतात. मात्र सध्या गुंठ्याने जमीन विकता येत नसल्याने शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. अश्या परिस्थितीत जमीन विकता येत नसल्याने पैसा कुठून आणावा असा प्रश्न त्यांना पडतोय.

Maharashtra Government Tukdabandi Order Court Implementation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ज्वेलर्सने घातला स्टेट बँकेला तब्बल ४०५ कोटींचा गंडा; असे झाले उघड

Next Post

Happy Birthday Manoj Bajpayee! असा बनला हिरो… एवढी आहे संपत्ती.. जाणून घ्या त्याच्याविषयी सर्वकाही

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
Manoj Bajpayee

Happy Birthday Manoj Bajpayee! असा बनला हिरो... एवढी आहे संपत्ती.. जाणून घ्या त्याच्याविषयी सर्वकाही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011