रविवार, डिसेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; आता अशी राहणार प्रक्रिया

मे 28, 2023 | 11:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांबाबत नेहमी चर्चा होत असते प्रत्येक शिक्षकाला सोयीच्या ठिकाणी बदली हवी असते यासाठी ते राजकीय नेत्यांकडे वशिला लावतात, परंतु यापुढे असे घडणार नाही. कारण राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. यात बदली झालेल्या शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करुन घेण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर बदलीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यामुळे सरकारच्या पातळीवर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे बदल नवीन धोरणात करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता आहे.

[शिक्षकांना मोठा दिलासा
शिक्षकांच्या बदल्या संदर्भात एक धोरण असावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत होती ती आता पूर्ण झाली आहे. आता या बदल्या राज्यस्तरावर होणार असल्या, तरी त्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाईन अर्ज संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात करावा लागणार आहे. याशिवाय बदलीसाठी इच्छुक शिक्षकांचे विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून रोस्टर(बिंदू नामावली) तपासल्यानंतरच होणार असल्याचे नवीन धोरणात स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी यापूर्वी असलेले राज्य शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. नवीन धोरणानुसार जिल्हा परिषदांकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अशी आहे नियमावली व धोरण
शिक्षकांच्या बदल्या संदर्भात राज्य शासनाने धोरण जाहीर केले असून एक विशिष्ट नियमावलीनुसारच या बदल्या करण्यात येणार आहेत. बदलीसाठी जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या ३१ मे अखेर किमान ५ वर्षे सलग सेवा होणे आवश्यक आहे. तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची परवानगी किंवा संधी असेल. बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती आणि बदलीच्या जिल्ह्यात रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी १५ दिवसांचा कालावधी असेल. एक महिन्यानंतर बदली रद्द करता येणार नाही. तसेच बदली रद्द करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाच असेल. बदली आदेश रद्द करणे, हा संबंधित शिक्षकाचा हक्क नसेल. याबाबत सरकारकडे अपील, विनंती करता येणार नाही.

तर शिस्तभंगाची कारवाई
बदलीसाठी दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही होईल. पदन्नोत किंवा पदस्थापना होऊन वेतनोन्नती झालेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत तसंच वेतनोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्यांचा बदल्यांसाठी विचार केला जाईल. त्याचप्रमाणे जर पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास दाम्पत्यापैकी एकाला त्याचा जोडीदार ज्या जिल्ह्यात कार्यरत असेल, तिथे बदली मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल. या जिल्ह्यात जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील. आता या नियमांची काटेकर अंमलबजावणी होते की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Government Teachers Transfer Rule

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

३१ मे च्या आत इलेक्ट्रिक वाहन घ्याल तर फायद्यात रहाल, अन्यथा…

Next Post

लॉन्च झाली ही इ स्कूटर… एका चार्जवर १४० किमी पर्यंत धावणार… एवढी आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Amery e scooter

लॉन्च झाली ही इ स्कूटर... एका चार्जवर १४० किमी पर्यंत धावणार... एवढी आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011