शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रात भारनियमन अटळ; संपकरी कर्मचाऱ्यांची आजची बैठक रद्द

by Gautam Sancheti
मार्च 29, 2022 | 11:12 am
in मुख्य बातमी
0
electricity

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रात भारनियमन अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे. वीज मंडळाचे खासगीकरण होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट करुनही कामगारांनी संप मागे घेतलेला नाही. तसेच, त्यातच ऊर्जामंत्र्यांसोबत संपकरी कामगारांची आज होणारी बैठकही रद्द झाली आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी राज्यात भारनियमन होण्याची दाट चिन्हे आहेत.

राज्यातील वीज निर्मिती केंद्रांचे काम कर्मचाऱ्यांअभावी प्रभावित झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वप्रथम भारनियम सुरू करण्यात आले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर टप्प्याटप्प्याने भारनियमन वाढविण्यात येणार आहे. वीज निर्मितीच होत नसल्याने तिचा पुरवठा करणे अशक्य आहे. संपकरी कर्मचारी जोवर कामावर रुजू होत नाही तोवर वीज निर्मिती होणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बँकेसह विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली. या बंदसोबतच वीज निर्मिती करणाऱ्या कामगारांनीही संपात उडी घेतली आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये यासाठी राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू करण्याचा इशारा दिला. तर, दुसरीकडे वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा साठा पुरेसा नसल्याचे निदर्शनास येत आहे. कोळशाचा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड येथील कामगार संघटनाही संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे कोळशाचे उत्खनन करण्यापासून ते त्याची वाहतूक करणाऱ्या सर्वच कामगार संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील विविध वीज निर्मिती केंद्रांवर केवळ २ ते ३ दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. दोन दिवसाच्या संपानंतरही तातडीने कोळसा मिळाला नाही तर वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे. त्यातच कडाक्याच्या उन्हामुळे वीजेची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत राज्यात भारनियमन होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, याची दखल घेत राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन अन्यय पर्यायांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्याला यश आलेले नाही.

आजची बैठक रद्द
राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी आज (२९ मार्च) दुपारी 2 वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात येईल. प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले. मात्र, आजची ही बैठक रद्द झाली आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या 27 वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो. उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला हजर रहावे आणि संप मागे घ्यावा, असे आवाहन डॉ.राऊत यांनी केले होते. ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्या होणाऱ्या बैठकीला हजर राहून चर्चा करण्यास तयारी दर्शविली. मात्र, आजची ही बैठक अचानक रद्द झाली आहे. त्याचे कारणही समजू शकलेले नाही. त्यामुळे मात्र, वीज निर्मितीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून भारनियमन आता अटळ असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच रशिया-युक्रेन युद्ध होऊ शकते समाप्त; कसं काय?

Next Post

राजस्थानची आयएएस अधिकारी होणार महाराष्ट्राची सून; जाणून घ्या या दाम्पत्याविषयी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
tina dabi

राजस्थानची आयएएस अधिकारी होणार महाराष्ट्राची सून; जाणून घ्या या दाम्पत्याविषयी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011